Saturday, February 15, 2025

नवा अनुभव घेण्यासाठी पुन्हा सज्ज ....!

 


त्याने कधीचे ठरविले होते..की मन घट्ट करायचे.. पण नुसते ठरवून काय होते..ते प्रत्यक्षात यायला हवे. ना..?

रोज आपण नवे संकल्प करतो..पण ते विसरून जातो..किंवा.. सुरवात होते. पण पुढे काहीच होत नाही..
हो ना..अगदी तसेच..
यासाठी आता त्याने आपल्या मनाशी नक्की केले..मनात फार विचार आणायचे नाहीत..अगदी शांत रहायचे.. कुठलाच तसा विचार करायचा नाही..
त्याने मनाला निक्षून सांगितले.. रे मना बन दगड..!
त्यालाही ते कळत होते.. ते सांगणे..किंवा शब्दातून ठरविणे सोपे होते..पण तेच प्रत्यक्षात येणे किती कठीण आहे.ते..
नाही नाही..नाही..
आता बघाच ..मी ठरवितो. आणि ते नक्की अमलात आणतो ते..
त्याने काय होईल..त्याच्या या निर्णयाचा परिणाम..इतरांवर होत राहील.. ते ही थोडे निवांत होतील.. घर शांत होण्यास मदत होईल..
याने मनात काय घेतले ..
एकदा घेतलं म्हणजे..तो ते इतराना ते पटवून देत असे..
कारण त्याच्या मनात विविध गोष्टी येत असत..
त्यात अगदी टोकाचे विचार असत..जर असे प्रत्यक्षात झाले तर..
अरेरे.. किती वाईट ..
मग काय होईल..
बापरे..
मन धास्तावे.. मनात चर्र होई.. एक अनामिक भीती मनात येई.. काही बरे वाईट..झाले तर..
म्हणजे एकच की मन चिंता करत राही..
त्याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होऊ लागे..
आधीच ब्लड प्रेशर वाढले..आता..त्यात यामुळे अधिक भर..
पण मग करायचे काय..
तर मन घट्ट करायचे..
कसलाही विचार करायचा नाही..
सतत आनंदी आणि समाधानी राहण्यासाठी काही उपाय आहे काय..?
वारंवार तो विचार करी..
पण अगदी हात टेकले आहेत याच्यापुढे..
असे घरचे लोक म्हणत असत..
मात्र त्याने ठरविले की आपण कुणाचे ऐकणार नाही..
आपली तब्येत यामुळे बिघडते आहे.
मनात नको ते विचार यायला लागतात..
कधी कधी..रात्रभर झोपही येत नसे..
आली तर मध्यरात्री ३ वाजताच जाग येऊन..पुन्हा त्या निद्राराणीचा विचार करावा लागे..कधी पहाटे
लागला डोळा तर लागे..नाहीतर ती रात्र तशीच निघून जाई..
याला त्याने ठरविले..की आता नको ती चिंता ..अनावश्यक विचार.. करायचे नाही..
जे होणार ते ..होणारच..मग आपले मन त्यात गुंतून ठेवण्यात काय अर्थ आहे..
खूप वेगवेगळी स्वप्ने पाहत असतो..तो..
ज्या स्वप्नांना खरे तर काहीच अर्थ नसतो..
पण ती भयानक..आणि अवास्तव असतात..
जे कधी प्रत्यक्षात घडत नसते..तसली स्वप्ने डोळसपणे पण झोपेतच पाहिली जातात..
त्याची भयानकता त्याला भिवविण्याचे काम करीत..
आता तेही त्याने ..असेच होणार असे मनाशी पक्के केले..ते सत्य नाही..ते कल्पनेत दडलेले डोक्यात ..साठलेले..आणि जे कधीच प्रत्यक्षात होणार नाही..ते दिसत असते...
मन चिंती ते वैरी न चिंती..म्हणतात ना..अगदी तसे..
आता हे सारे घडत असताना.. वास्तव जीवनाकडे सकारात्मकतेने पहाणे हेच खरे. ते आता त्याने गृहीत धरले आहे..
पण आता वास्तव जीवनाकडे अधिक डोळसपणे पहाणे..
आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघणे..दिवसा जे घडत आहे..त्याकडे लक्ष देत आनंदी आणि समाधानी राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी करत रहाणे..हीच खरी उत्तम सुरवात आहे..असे स्वतः ला सांगत नवे आयुष्य ..
नवी पालवी फुटून..नवा अनुभव घेण्यासाठी पुन्हा
तो सज्ज झाला आहे..
शुभंभवतू..!





- Subhash Inamdar,
Pune

subhashinamdar@gmail.com
लाईक
टिप्‍पणी
पाठवा

No comments: