

स्त्रीच्या विविध रूपांना जागविताना जीएंचे साहित्य आजही वेगळेपणाचे वाटते. स्त्रीच्या असाह्यतेचा.
त्यांच्या सहनशक्तिचा सभोवतालच्या परिस्थतीचा आणि त्यांच्यातल्या भावनांचा खोलवर घेतलेला मागोवा
`वस्त्र` या कथेच्या नाट्यवाचनाच्या माध्यमातून त्यांच्या ८९व्या जयंतीनिमित्त पुण्यात घेतला गेला.
अनुराधा जोशी, उत्तरा बावकर आणि गजानन परांजपे यांनी केल्ल्या अभिनाचनातून
त्यांची व्यक्तिरेखा मांडण्याची रित आणि त्यातली वीण रसिकांसमोर उलगडली गेली.
आपल्या भावाच्या कौटुंबिक आठवणीतून नंदा पैठणकरांची जीएंचे खासगी रूप उलगडताना
त्यांना अवडणा-या दडपे पोहे-खूप खोबरे घातलेले..पुरणपोळी कटाची आमटी...सारेच .
जीएंच्या कथेतल्या स्त्री व्यक्तिरेखांबाबत बोलताना डॉ.विणा देव यांनी त्यांच्यात असलेल्या
विलक्षण निरीक्षण शक्तिचे आणि संवेदनाशिल मनाचे दर्शन कथेतल्या स्त्री पात्रांतून कसे पाझरत रहाते
याचा उदाहारणासह खास उल्लेख करताना कथांचे दाखलेही दिले.
समाज, परंपरेने स्त्रीच्या ठायी अनंक बंधने लादल्याचे आणि तिच्या वाट्याला आलेल्या भोगाचे कथेत केलेले
वर्णन करताना वाचताना डोळ्यात अश्रु येतात..आपण त्या व्यक्तिरेखेबरोबर गुंतत जातो. तिच्या वेदनेत..
भोगाचा एक भाग बनतो. त्यांच्या दुःखात सहजपणे विरघळून जातो.
आज त्यांच्या कथेत जी दुःखे स्त्री भोगत आहे त्याचे चित्रण आजच्या काळात थोडे परंपरावादी वाटते पण
तिच्या कौटुंबिक बंधनात आजही फारसा फरक झाला नसल्याचे डॉ. विणा देव सांगतात.
कधीही समाजाला प्रत्यक्ष न दिसलेला पण आपल्या साहित्याने घरात आणि मनात पोचलेल्या
जीएंच्या स्मृतींना उजाळा देण्याचे काम नंदा पैठणकर गेला काही वर्षे सातत्याने करीत आहेत.
यंदा त्याच्या सोबत पुण्याची साहित्य परिषद सहभागी झाली.
या निमित्ताने जीएंच्या साहित्याविषयीची चर्चा घडते . त्यावर विचार होतो.
या सांस्कृतिक भूमित त्यांची आठवण होते.
जीएंच्या लेखणीचे मोठेपण ( जे अनेकांना ठाऊकही नाही) ठसविले जाते. हेच महत्वाचे .
सुभाष इनामदार, पुणेMob. 9552596276
Mail- subhashinamdar@gmail.com
No comments:
Post a Comment