
होय आज मी जरा नाही पण बराचसा कटू वागलो. माझे घर अकरा महिण्याच्या करारावर घेण्यासाठी ते करारपत्र रजिस्टर करण्यासाठी परगावहून आलेले. काही मामलेदार कार्यालयातल्या दिरंगाईने आज ते रजिस्टर होऊ शकले नाही.
मागच्या भाडेकरुचा अनुभव पाहता माझा निर्णय ठाम होता. करार रजिस्टर झाल्यावरच घराची किल्ली ताब्यात द्यायची.
ते गृहस्थ तसे माझे परिचयाचे झाले होते. सज्जनही होते. पण मी आज करार नाही. ताबा नाही. हे तत्व कायम धरुन ताबा देण्याचे चक्क नाकारले. माझ्या भूमिकेवर ठाम राहिलो.
त्यांनी मोठ्या आशेने आपल्या मुलाला आज रात्री पुण्यात राहता येईल अशा भरोशावर बरोबर आणले.
पण माझ्या या ताठर भूमिकेने त्यांचा व त्याचा मूड गेला.
मागच्या भाडेकरुने आज करार करु..उद्या करु..म्हणत दोन महिने घेतले. शेवटी करार न करताच हरप्रयत्न करत बाहेर काढण्याची वेळ आली. मला हा अनुभव बरेच काही शिकवून गेला.
वास्तविक माझ्या वकीलाने वेळ दिल्याने ते परगावहून आले. पण मामलेदार कचेरीत आज वकीलांचा शेवटचा दिवस. उद्यापासून दिवाळीच्या सुट्टीवर. म्हणून करारपत्र करण्यासाठी ही ही गर्दी. सार मामला जोरदार, कोण काय बोलणार. बीचा-या आशीलाला कोण विचारणार. सारे राज्य कारकून आणि वकील मंडळींचे
आम्ही बापडे लाजीरवाणे.
यात आमचेही भरीत झाले. करार झाला नाही.भाड्याने घेणारे मला म्हणाले आज ताबा यात आमचेही भरीत झाले.
करार झाला नाही.भाड्याने घेणारे मला म्हणाले आज ताबा द्या. त्यांची विनवणी धुडकावून
मी नाही म्हणले....करार आधी मग चावी....
यात माझे काय चुकले?
subhash inamdar
subhashinamdar@gmail.com
9552596276
No comments:
Post a Comment