
स्वातंत्र्य मिळाले खरे पण ते आपल्याला सांभाळता आले काय ?
जय स्वातंत्र्य...
प्रत्येक घरात वीज येणार...पंतप्रधानांनी आज लाल किल्ल्यावरुन जाहिर केले...पण...वीज जोड येईल हो..पण वीजेची टंचाई..शेतात पंप आहेत..पण ते सुरु होण्यसाठी वीज नको काय....सारेच घोषणाबाजीचे दिवस...फक्त टाळ्या वाजवत ऐकायचे एवढेच आपल्या हाती आहे...
हा प्रश्न पडतो आजचे भ्रष्ट्र आणि त्रस्त लोकांचे जीवनमान पाहून...आपल्याला जे मिळविले त्याची किंमत आहे..ती पुढे पेलता आली नाही...हातात सत्ता दिली म्हणजे सामान्यांच्या जीवनाकडे दुर्लक्ष करुन राजकीय मंडळींनी हा देश..लाचार आणि महागार्इने त्रस्त अशा नागरिकांचा तयार केला..त्यांना आतुन कितीही वाटले तरी आता त्यांना रोडच्या जगण्याची लढाई करावी लागते..ती रोजच्या जीवनातील प्रसंगांना आणि घरी असलेल्या भुकेल्यांसाठी कमावण्यासाठी...तो जगतो.. जीवनात कमावतो...पण सारेच व्यर्थ्य खर्ची पडते...
बेसुमार महागाईचा वरवंटा त्याला घेऱून तो आपल्याच विश्वात फिरत असतो...क्रांतीचा जयजयकार करण्याची इच्छा त्याला आहे..पण तसे बळ पायात किंवा अंगात संचारत नाही...
मिळेल मोकळा वेळ तेव्हा तो कांही प्रमाणात स्वातंत्र्यात..स्वतःच्या आनंदात जगत असतो....
कधीतीरी हे सारे बदलेल...असे कुठेतरी वाटते म्हणून स्वातंत्र्यदिनही पाळतो...सांभाळतो....पण ज्यांनी देशातल्या जनतेची सेवा करण्याची प्रतिज्ञा घेतलेल्या लोकांना आपण खरच या शपथेशी प्रामाणिक आहोत काय..हा स्वतःला प्रश्न विचारायवला हवा...
चिरायू स्वातंत्र्याच्या गप्पा मारणा-या राजकीय आणि तथाकथीत नोकरशाहीला जनतेकडे पहाण्याचे बळ मिळो..हिच इच्छा...
सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
No comments:
Post a Comment