
कधीकाळी मी पीडीएत होतो...तेव्हाची आठवण व्हायचे कारण..कल्याणी या ज्योत्स्ना देवधर यांच्या नाटकात आम्ही काही जण ज्यांना रंगमंचाच्या मागे काम करायची नेमणूक झाली होती...त्या नाटकात काम करणा-या हौशी ज्येष्ठ कलावंत यांचा काल मला अचानक फोन आला..त्यांचे ८४ वर्षांचे पती गेले. त्यांची बातमी कुठे देता आली तर पहावी...
सुमारे १७ वर्ष त्या बिबवेवाडीतून गावात रहायला आल्या पण मला पत्ताही नव्हता... आणि अचानक माझी आठवण...
असो..त्यांचे काम सुख,दुःख याच्या पलिकडचे आहे..ते करायला हवे..पण कुठली गाठ केव्हा पडते ते सांगता येत नाही...हेच खरे..
मदत शक्यतो सर्वांना करीवी ...तीही निरपेक्ष...अखेरीस तिच तुमची ओळख असते..
-------------------------------
फुलांच्या गंधानी घाय़ाळ करावे
असे माझे मन चिंब भरलेय
सारीकडून एकच गलका
कुणातरी झाडावरुन पडलंय...
------------------------
गेल्या पावसाची गोष्ट
धो धो कोसळत
चक्क मला भिती दाखविली
यंदा मात्र तो फिरकलाही नाही...
--------------------------
आज सकाळी या खालील दोन ओळी मनात आल्या चालीसह..
मनास माझ्या का दिसावे ?
स्वप्न उरे ते अधुरे व्हावे ...
यापुढे काही सुचलेले नाही..तुम्हाला कांही सूचत असेल तर जरुर सांगा..
Deepak Sudhakar Kulkarni
आभाळाने भरून यावे,
ओल्या हिरव्या खांद्यांवरती,
दिलवराचे गोंदण हळवे
Awadhoot Deshpande
वेली फुलांनी बहरून यावे,
चिंब मनाने मोहरून जावे
स्वप्नांच्या त्या हिंदोळ्यावरती
प्रेमराग मधुर आळवून यावे!
-----------------------------

रोजचे जगणे निराळे
रोज नवा छळ
रोज तेच घड्याळ
रोज नवा खेळ
रोज तोच डबा
तेच सारे मित्र
रोज कामाचा ताण
रोज तेच आकडे खेळ
रोज हवा नवा थाट
रोज हवा नवा ध्यास
रोज नव्याने व्हावे
रोज स्वप्नांचे थवे
आज दिवस वेगळा
आजचा खेळ वेगळा
वेगळ्या वातारवरणात
भासतोय ताजेपणा...
-subhash inamdar.pune
--------------------
थोडं धाडस दाखव..
मनासारखं वाग..
सततचे दडपण झुगारुन दे..
ताण घेतला आहेस..
थांब..जारा विचार कर..
जन्म एकदाच लाभतो..
मग कुणासाठी पुढची संधी येणार..
याच जन्मात मुक्तपणे जग
जगासाठी नव्हे..स्वतः साठी..
मोकळेपणा खरं तर तुझ्यात आहे..
काही वर्षात मात्र तो हरवलीस..
आता मागचे सारे विसरुन जा..
मनसारखे जगत जा...!
subhashinamdar@gmail.com
-----------------------------------
आजही मोहरुन येतं मन
जेव्हा तू मला सुंदर म्हणतोस
बहरलेल्या पारिजातकासारखे
स्वच्छ अहे तुझे मन..पारदर्शी.
निखळ..काहीसे उथळ..
तरीच मला सतत वाटते
तुझ्या त्या नजरेतही मी दिसते..
इतकी सुंदर...खरचं..सांग ना..
-------------------------------
येणारा प्रत्येक सूर
गळ्यातून काढता यायला हवा
इतरांसाठी नाही तरी स्वतःसाठी
आनंद मनमुराद लुटायला हवा.
------------------------
इतकं डोकावून पाहताना वाटतं.
काहीच शिल्लक उरणार नाही.
काही वेळाने पाहिले..
तर तिथे तिळमात्रही उरणार नाही..
-------------------------
नाती जपण्यासाठी मनं मोठी असावी लागतात
मनाला स्वतःची अशी जागा नसते
दुस-याच्या भावनेत त्याचे पाय अडकलेले असतात
भावनेला समजून घतले की सारे कसे मनासारखे होते.
अशाच भावनांना सांभाळून
राखून,
शक्य असेल तेव्हा सांधून नवी नाती निर्माण करा...
तीच आयुष्यात उपयोगी पडतील..
इति-
सुबाष इनामदार, पुणे
-----------------------------
राज्य सरकारचे लेचेपेचे धोरण
नशीबी आहे महाराष्ट्राच्या
म्हणून वाढतीय गुन्हेगारी
होताहेत आंदोलने आणि निघताहेत मोर्चा
जनता रडती आहे..
पावसाने बेजान झालीय
महागाईने जर्जर
आहे का त्यांना त्याची काही पडली..
ते आपल्या आरामदायी महालात पहूडलेत
पण एक दिवस त्यांचीही वेळ येईल
मग पळता भुई थोडी होईल..
मग कितीही धावा केला
तरी कुणीही ढुंकूनही पाहणार नाही..
सावधान..वेळ भरत आली आहे...
-subhash inamdar,Pune
----------------------------
कोरी पाटी घेऊन जसे आपण शाळेत बसतो..तसेच जीवनात आहे..
तिथेही प्रत्येक दिवस ..क्षण आणि काळही नवे धडे देत असतो...
ते टिपून घ्यायचे कौशल्य जर दाखविलेत..
तर तुम्हाला सारे काही न मागता मिळेल..
इति- सुभाष इनामदार, पुणे
-----------------------
पानं उलटतात
मनं पालटतात
कालचं आज
सारेच विसरतात
------------------------
जगात न्याय नक्की आहे..
तुम्ही दुस-याला फसवलत..की समजा.. तुम्ही नक्की फसणार..मात्र तो काळ सांगून येत नाही..तो येतो आपल्या पावलाने..
स्वतः चर एखादा माणूस कसल्याही कारणावरुन ..स्पष्टच सांगायचे झाले पैशाच्या व्यवहारात...स्वतः फसलेला असेल..तर तो
स्वतः मी नाही बुवा त्यातल्या...दाखविण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने मी नाही हो असे केले हे सांगण्यासाठी त्याचा डंका पसरविण्याचा प्रयत्न करतो...त्याच्या हे तेव्हा लक्षात येत नाही..तो स्वतःसाठी त्यात खड्डा खणत असतो..
गोष्ट उघड्या पडू लागल्या की मग त्याचा सारा खरे पणा आमि फोलपणा बाबेर येतो...मग सारं बिंग बाहेर येते...
न्याय नक्की आहे..पण तो वेळेवर मिळत नाही हे खरं...न्यायालयातही तारखा पडून .खेटा घालून..न्याय मिळतो...पण तेही..दिर्घकाळाने तसेच हे आहे..
-सुभाष इनामदार, पुणे
------------------------------
No comments:
Post a Comment