Tuesday, July 2, 2013

"नारबाची वाडी"



 
कोकणची निसर्गरम्य पार्श्वभूमी  या चित्रपटाला तर लाभली आहेच पण त्याचबरोबर तांबड्या मातीतील एक -एक इरसाल नमुने प्रेक्षकांसाठी खोचक हास्याची बरसात करणार आहेत. एका खट म्हाताऱ्या शेतकऱ्याची आणि त्याच्या मग्रुर मालकाची हास्याफोटक जुगलबंदी म्हणजेच वैकुंठाला जाता जाता. 


कोकणातल्या सर्व इरसालांचे गुरु दिलीप प्रभावळकरच प्रमुख भूमिकेत असल्यामुळे हास्याचे पिक भरभरून आले तर नवल कसले?  जोडीला मनोज जोशी, निखिल रत्नपारखी, अतुल परचुरे, किशोरी शहाणे, विकास कदम, ज्योती मालशे, भाऊ कदम, कमलाकर सातपुते हि एकापेक्षा एक वरचढ मंडळी असल्यावर हास्याची उधळ माधळ व्हायला कोंकण अधुरेच पडणार ! शिवाय साथीला कोकणातील अदभूत रम्यता आणि रांगडेपणा आहेच. या चित्रपटात दिग्दर्शनाची बहार उडवून दिली आहे ती आदित्य सरपोतदार या तरुण आयडियाबाज तरुणाने. 
 
तांबड्या मातीतल्या आणि हिरव्यागार डोंगरातल्या सौंदर्या बरोबरच सर्व व्यक्तींचा माणूसपणा नेमका टिपलाय छायाचित्रकार राहुल जाधव यांनी. मंगेश धाकडे यांच्या संगीताला आंब्याचा रसाळपणा आहे तर आमोद दोषी यांनी झक्कास सोंग बाजी रंगवली आहे. कला दिग्दर्शनाची धुरा उचलली आहे ती शीतल कानविंदे आणि महेश कुडाळकर यांनी . 

या चित्रपटातील गुरूंचे गुरु आहेत, पटकथा संवादात दशावतारी रंगत असणारे गुरु ठाकूर. त्यांच्या  रचनेत शिमग्याचा आनंद आहे. 
 विनोदाची लज्जतदार मेजवानी घेऊन येणारा `नारबाची वाडी ` हा चित्रपट मराठी प्रेक्षकांना हास्याची लज्जत खात्रीने देईल. 

कलर्स वाहिनीवर गेली साडेचार वर्ष यशस्वीरीत्या `उतरन` या मालिकेची निर्मिती करणारे निर्माते कल्याण गुहा आणि रुपाली गुहा आणि त्यांच्या फिल्म फार्म ह्या निर्मिती संस्थेची  पहिली कलाकृती प्रेक्षकांना नक्कीच भुरळ पाडेल.
 
चाकोरी बाहेरचा वेगळेपणा हे बंगाली आणि मराठी कलाकृतीच खास वैशिष्ट्य असतं, म्हणूनच शज्जानो बागान या मनोज मित्र लिखित गाजलेल्या कादंबरीवर आधारित `नारबाची वाडी` हा मराठी चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शीत होईल.

 

Saturday, June 29, 2013

नाट्यसंगीताचा बहारदार नजराणा....

पुण्याच्या ऐतिहासिक अशा हिराबागेतल्या टाऊन हॉल कमिटीच्या पेशवाई दिवाणखान्यात शुक्रवारी संध्याकाळी पावसाळी वातावरणाचा साज बाहेर सजत असतानाच नाट्यसंगीताच्या सुरावटींचा बहर एकामागोमाग  रंगत होता...ज्या वास्तुने अतिशय वेगळ्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वांची व्याख्याने..ऐकली ..समाजातल्या धुरंदर मंडळींचे कौडकौतूक केले..त्या या वास्तुत रंगलेल्या मैफलीची आठवण आजही ताजी आहे..संगीत नाटकांच्या वैभवशाली पंरंपरेचा भरजरी नजराणा दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या वतीने पूर्वी भावे यांच्या सुरेल निवेदनातून पुणेकरांच्या पसंतीस पडला...त्यांनी वन्समोअरच्या आणि टाळ्यांच्या निनादात नाट्यसंगीताच्या या पदांना दिलखुलास दाद दिली.

१८८० सालच्या `संगीत शाकुंतल` या संगीत रंगभूमीचा आरंभ समजल्या जाणा-या नाटकातल्या `पंचतुंड नर रुंड मालधर..`  या नांदीने कार्यक्रमाची सुरवात केली.. 


श्रीरंग भावे, धनंजय म्हसकर, गौतमी चिपळूणकर आणि ऋतूजा लाड या चार तरुण कलाकारांनी नाट्यसंगीताच्या सादरीकरणातून आजही समर्थपणे ही युवापिढी किती तयारीने नाट्यसंगीताची ही परंपरा सांभाळते आहे याचे उदाहरण मिळते.

`नांदी ते भेरवी`... असा सतरा गीतांचा हा प्रवास या कलावंतांनी आपल्या ओजस्वी आवाजातून रंगतदारपणे सादर केला...यातही अमोल पटवर्धन या मुळातल्या सांगलीच्या पण सद्या पुण्यात राहणा-या कलाकाराने सादर केलेले ययाती-देवयानी या नाटकातले `प्रेम वरदान हे पद...`   तसेच सावनी दातार-कुलकर्णी यांनी भावगीत आणि नाट्यसंगीत यांचे एकत्रित मिश्रण असलेले ज्योत्स्ना भोळे यांनी कुलवधूसाठी गायलेले पद `खेळेल का देव माझा माझीया अंतरी...`आणि गायत्री वैरागकर-जोशी यांनी आवाजातली ..... दमदार तयारीतून सादर केलेले `आज सुगंध आला लहरत `...यातून आपली नाट्यसंगीतातली पकड सिध्द केली. 

`मंदारमाला` नाटकातली `बसंत की बहार आयी... `या श्रीरंग भावे आणि धनंजय म्हसकर यांच्या बहारदार सादरीकरणाने  दोन्ही कलावंताने आपली छाप पाडली.

`हे सूरांनो चंद्र व्हा..`हे ऋजूता लाड हिने गायलेले पद तर फारच आकर्षक होते..त्यातला भाव आणि त्यातली आर्तता सारेच तिच्या सुरांमधून आतप्रोतपणे व्यकत झाले..यातून तिची तयारी आणि सादरीकरणातला दिमाखदारपणा साराच सूरांतून पाझरतो..




श्रीरंग भावे यांचे कट्यार मधले `घेई छंद...` 
















 आणि धनंजय म्हसकर यांचे `श्रीरंगा कमला कांता..`ही दोन्ही पदे रसिकांनी डोक्यावर घेतली...
म्हणजे त्यांच्या पसंतीची पावती वन्समोअरच्या निनिदात मिळाली...दोघांचीही स्वरांची हुकमत आणि नाटयसंगीत गाण्यासाटी पुरेशी तयारी ..सारेच उत्तम...

ऋजूता लाड हिने अखेरीस सादर केलेले `कट्यार`मधील `लागी कलेजवा कट्यार`....चा परफॉमन्स तर खरोखरीच लाजवाज होता...



`बालगंर्धव `चित्रपटातल्या ...`चिन्मया सकल ह्दया ..`या भेरवीने जेव्हा श्रीरंग भावे यांने मैफलीची सांगता केली  तेव्हा असा कार्यक्रम अजुन चालावा अशी चुटपूट लागून राहिली..
ही मैफल रंगण्यापाठीमागे आहेत आणखी दोन कलावंत..

खरे तर हे चारही गायक कलाकार मुंबईचे..पण त्यांना साथ करणारे आमचे पुण्याचे राजीव परांजपे यांचा ओर्गनवरचा बोलका हात जेव्हा स्वरांवर हळुवार फिरतो हे मान्यच करायला हवे..

एकूणच नाट्यसंगीताचा हा बहारदार नजराणा इथे रसिकांसमोर सामोरा आला...


त्यातली मैफलीची रंगत वाढविणारे पूर्वी भावे हिचे निवेदन होते..त्यात माहिती तर होतीच पण याविषयाची मांडणी आणि नाटकातल्या संगीत परंपरेचा असलेला अभ्यासही आर्वजून दिसत होता...सहजता आणि माधुर्यता याचीही यात तेवढीच ताकद होती...


एकूणच ज्यांनी या नाट्यसंगीत मैफलीचा आनंद घेतला ते रसिक भाग्यवान ठरले....असे कार्यक्रम करून दादार माटुंगा कल्चरल सेंटर आपल्या दिमाखदार परंपरेचा सार्थ अभिमान बाळगत ती जोपासत ठेवण्याचे व्रत अंगीकारत आहेत...याचा अभिमान आहे..

दादर माटुंगा कल्चरल सेंटरचे सेक्रंटरी अशोक केळकर यांचेही कौतुक करायला हवे..गेली पाच वर्ष टाऊन हॉलच्या या भव्य आणि एतिहासिक व्यासपीठावर आपल्या संस्थेच्या वतीने नवनवीन नजराणा पुणेकर संगीत रसिकांना बहाल करीत असतात...






- सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276





Thursday, June 27, 2013

दगडातल्या झ-यातून पाझरणा-या ज्ञानगंगा






"मी ७४ वर्षांनंतर आज या माझ्या विद्यार्थ्य़ांनी मला शाळेत खेचून आणले. खरच मी त्यांचा आभारी आहे. आपल्या शाळेला दगडी शाळा म्हणतात.या दगडातून ज्ञानाच्या कितीतरी गंगा स्वतंत्रपणे समाजात वाहताहेत. या ज्ञानमाउलीला तोड नाही. या माऊलीली जपा.  शाळेची परंपरा पुढे चालवा. या शाळेसारखी उत्तुंग उंची गाठा. माझे तुम्हाला भरभरुन आशीर्वाद आहेत.... "

शनिवारी, ८ फेब्रुवारी २०१३ ला सुमारे ४२ वर्षानंतर आम्ही १९७१च्या अकरावीची बॅच माजी शिक्षकांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आजच्या शाळेच्या पदाधिका-यांच्या परवानगीने शाळेतल्या ८ वी व ९ वीतल्या एकेका तुकडीतल्या ९० मुलां-मुलींसमोर हा समारंभ आखला. त्यात आमच्या शाळेतले त्यावेळी संस्कार आणि ज्ञान देणारे आमचे गुरुजनांना शाळेत पाचारण केले..त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आशीर्वाद घेतला. त्यापैकी सर्वात जेष्ठ असे पिंगळे गुरुजी यांनी या प्रसंगी व्यक्त केलेले आरंभी दिलेले मनोगत खूप कांही सांगुन जाते.
गेली १० वर्ष आमच्या वेळचे विद्यार्थी कुठे ना कुठे एकत्र जमतो..शाळेच्या घडणीतून विविध श्रेत्रात स्वतःचे योगदान देणारे सारे मुलं-मुली काही ठोस विचार करतो. एकमेकांची सुखे-दुःखे वाटून घेतो. संस्कार हा शब्दही विसरत चालला असताना..शिक्षण देणा-या संस्थांचे आजचे बाजारी आणि केवळ पैसा हेच धेय्य बाळगणा-या शिक्षण संचालकांच्या वाढत्या काळात कित्येक वर्षांनंतर १९७१च्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत येऊन केलेला हा शिक्षकांचा सन्मान हे विरळे दृष्य काही निवडक मंडळी शनिवारी अनुभवित होती.
दोन दिवसानंतर ह्याचे वर्णन करताना आजही ते सारे डोळ्यासमोर चित्र आणि गुरुजनांचा आशीर्वादपर संदेश मनात कायमचा कोरला गेला आहे.  यापुढे शाळेला जेव्हा केव्हा काही मदत लागेल तेव्हा खंबीरपणे उभे राहण्याचे आम्ही सा-यांनी ठरविले आहे.
याप्रसंगी आम्ही न्यू इंग्लिश स्कूल, सातारा  या आमच्या शाळेत आम्ही १९७१ च्या अकरावीचे सुमारे ६०-७० विद्यार्थी एकत्र जमून त्या काळातल्या शिक्षकांना शाळेत बोलावून त्यांचा सत्कार करुन त्यांचा आशीर्वाद घेतला. शनिवारी शाळतल्या काही मुलांसमोर शालामाऊलीच्या साक्षिने हे सारे घडले. द्रवीड, कंग्राळकर,यांचेबरोबरच शाळेच्या शाळासमितीचे मुख्य अशोक वाळींबे आणि सध्याचे प्रिन्सीपॉल शिंदे सर यांनी आपले विचार व मत मांडून हा समारंभ म्हणजे संस्काराचा किती मोठा भाग आहे..तोही या मुलांच्या साक्षीने व्हावा याचा आनंद व्यक्त केला.

त्याप्रसंगी आदरणीय कंग्राळकर, द्रवीड, लांडगे, माटे, हलगीकर, केंजळे, भाऊ आपटे, पिंगळे, के. पी. कुलकर्णी, कालगावकर, दामले या शिक्षकांचा सन्मान  विद्यार्थ्य़ांकडून करुन एक आगळा आदर्श घालून दिला.
आमच्यापैकी कांचन दोशी, कमलाकर क्षिरसागर, सुधीर देवधर, राजेंद्र देशपांडे आणि सुभाष इनामदार यांनी मनोगतातून शाळेच्या परंपरेचा सार्थ अभिमान व्यक्त केला.

संध्याकाळी आमच्याच एका विद्यार्थ्याचे कनिष्क कार्यालयात स्नेहमेळावा झाला. त्यातही शाळेच्या आजच्या परीस्थितीविषयी चर्चा होऊन..शाळेसाठी काही ठोस आर्थाक मदतीचा हात देण्याचे ठरले..काही वर्षापूर्वींच शाळेतल्या विद्यार्थ्य़ांसाठी शुध्द पाण्यासाठीची यंत्रणा बसविली होती.त्याचा सारा भारही आम्हीच उचलला होता.

मनोरंजनाचा  भाग म्हणून  सातारच्या चार कलावंताचा गाण्यांचा कार्यक्रम सादर झाला. त्यात या ५८ वर्षे वयाच्या चार आमच्याच मित्रांनी आपापली झलक सादर केली.
रविवारी सकाळी दोन वाहनांनी ठोसेघर, सज्ज्नगड आणि नंतर उरमोडी धरणाच्या परिसरात भटकंती केली.
दोन दिवस सुमारे ८० जण शाळेच्या त्यावेळच्या आठवणीत रमून केलेला दंगा, खाल्लेला मार आणि  झालेल्या संस्काराचे गोडवे गात दंग होऊन गेले होते..
यंदाच्या या दहाव्या स्नेहाच्या मेळाव्यातून हा मैत्री पार्क अधिक आनंदाने बहरुन गेला होता. सातारचे संजय बोपर्डीकर, शाम बेगमपुरे आणि जयंत सरवटे यांच्यासह अविनाश कुलकर्णी, मोहनदास देवींसह अनेक आमचेच मित्र तो यशस्वी करण्यासाठी काही महिने झटत होते

यापूर्वी पुणे, बारामती, गारगोटी, अलिबाग, डोंबिवली, वाई, इचलकरंजी अशा विविध ठिकाणी आम्ही मंडळी स्नेहवाटत..त्याचा सुगंध घेत एकत्र जमतात..शाळेच्या दिवसांची आठवण साठवण एकमेकात स्नेह दरवळत ठेवतात  .आणि यंदा तर शिक्षकांच्या सन्माच्या निमित्ताने शाळेत येतात..हा सारा हुरहुर लावणारा आणि हुरुप आणणारा काळ..
यासा-यातून मैत्री घट्ट होत जाते..स्नेहाचे धागे अधुन घट्ट गुंफले जातात...आणि पुढच्या पिढीवर संस्कार होतात.



- सुभाष इनामदार ,पुणे
(सदस्य मैत्री पार्क)
subhashinamdar@gmail.com
9552596276

Sunday, June 23, 2013

बालगंधर्व नटले आणि काहीसे ते पर्वही अवतरले..

`कलाद्वयी` या संजय गोगटे आणि विद्याधिश देशपांडे यांच्या संस्थेने अस्मिता चिंचाळकर, प्रियदर्शनी जाधव आणि अश्वीनी गोखले या तीन गुणी नाट्यसंगीताच्या पुण्यातल्या गुणी कलावंताकरवी बालगंर्धव गायकीचा पुरेपुर स्पर्श संगीत नाट्य रसिकांना दिला.

शनिवारची संध्याकाळ ज्योत्स्ना भोळे सभागृहाच्या छोटेखानी रंगमंचावर यातिनही गायिकांनी बालगंधर्व यांनी लोकप्रिय केलेल्या अनेकविध नाटकातल्या कांही पदांना अपल्याला शोभेल अशा शालीन वेशभुषेत शकुंतला, द्रोपदी, भामिनी, देवयानी, कान्होपात्रा अशा नायीकांच्या त्यावेळच्या पदांची रंगतदार मांडणी करुन ती रसिकांच्या पसंतीस उतरतील अशी सादर करुन हाऊसफुल्ल आणि वन्समोअरचाही गजर करून दाद देण्यास प्रवृत्त केले.

ही संकल्पना विद्याधिश देशपांडे यांची..त्यांनीच ती प्रत्क्षात उतरवली..पण त्यांचे खरे सूत्रधार आणि शब्दांतून व्यक्त केले ते वर्षा जोगळेकर यांनी... आपली सून आणि राम देव आणि सो. मीना देव यांची कन्यका आणि कलाविशारद वैभवी जोगळेकर यांच्या मदतीने नाटकाची माहिती..बालगंधर्व नाटकांची रंगत..त्यांच्या नाटकातली परंपरा आणि वैशिष्ठ्ये थोडी हटक्या पध्दतीने रसिकांच्या पसंतीस उतरतील अशा शब्दातून मांडण्याचा प्रयत्न केला..रसिकांना ही वेगळी पध्दतही तेवढीच खुश करुन गेली.

अतिशय संगीत रसिक प्रेक्षक या कार्यक्रमाला लाभला...पुन्हा पुन्हा याचे प्रयोग व्हावेत अशी इच्छा अनेक रसिकांची आहे..कारण हे सभागृह कमी पडल्याने अनेकांना परत फिरावे लागले..आणि हा देखणा ठेवा अनेकांना वारंवार पहाता येईल.

अर्थात संजय गोगटे आणि विद्याधिश देशपांडे यांच्या साथीलाही तेवढीच दाद द्यायला हवी...
सहज वाटणारी अशी ही बालगंधर्वांचे गुरु भास्करबुवा बखले यांनी गंधर्वांकडून तयार करुन घेतली..ती ऐकायला सोपी आणि साधी असली तरी प्रत्यक्षात आणि तेही वेशभुषेसह सादर करणे हे काम कठीण आणि धाडसाचे....
या दोन्ही तयारअसलेल्या या साथीदारांनी आपल्या समोर गात असलेल्या गायिकांना ठेका धरत पुढची सूरांची नजर त्यांना दिली...


एक आवडेल असला नजराणा त्यांनी संगीत रसिकांना दिला याबद्दल खरोखरीच ते कौतुकास पात्र आहेत.


-सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276


Saturday, June 22, 2013

व्यंगचित्रही जिव्हारी लागते तेव्हा...

व्यंगचित्रात जो कुत्रा दाखविला आहे तो पिसाळलेला आहे..शिवसेनेकडे पाळलेला कुत्रा असल्यामुळे तो भुंकत नाही आणि कुणाला विनाकारण चावत नाही....मंगेश तेंडूलकरांच्या ७०व्या व्यंगचित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना संजय राऊत यांनी राष्टवादीचे आमदार अंकूश काकडे यांना अशा कोपरखळी देऊन व्यंगचित्रही राजकीय नेत्यांना कसे लागते आणि किती खुपते याचे दर्शनच घडविले..

ही घटना घडली ती बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात...जिथे राष्ट्रवादीचे अंकूश काकडे यांनी एका व्यंगचित्राचा उल्लेख करुन यात राष्ट्रवादीचा कुत्रा तीन वेळा भुंकतो..मनसेचा नुसतीच कोल्हेकुई करतो...असे विविध राजकीय पक्षांवर काढलेल्या व्यंचित्रात शिवसेनेचा यात उल्लेखही केलेला नसल्याचे दाखवून दिले...याचा दाखला देत शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आपल्या भाषणात अशी शाब्दिक खेळी करत उत्तर दिले..

हे राजकीय लोक व्यंचित्रातला आनंद घेतानाही आपले राजकीय व्यासपीठ बिलकूल सोडत नाहीत..आम्ही तेंडूलकरांच्या व्यंगचित्राकडे पहाताना त्यातल्या आशयाकडे वेगळ्या पध्दतीने पाहतो...आम्ही ते सारे हसत हसत पचवितो असे म्हणतो..पण प्रत्यक्षात मात्र तसे व्यंग दाखविले की तुटूनही पडतो..कुठेतरी ते चित्र डोक्यात पक्के घेतो..आणि वेळ आल्यावर त्याचाही समाचार घेतो..हेच सिध्द केले.



खुद्द शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हे ही सांगत ...अनेक लेखातून जे व्यक्त होऊ शकत नाही ते व्यगचित्र एका चित्रात करते...व्यंगचित्रात हिच परंपरा संभाळणारे आता केवळ मंगेश तेंडूलकरच शेवटचे शिलेदार उरले आहेत...त्यांच्या व्यंगचित्रातून अनेक विषय माडतात...त्यांच्या कलेला सा-यां रसिकांनी असाच प्रतिसाद देऊन त्यांची कला याही वयात बहरत रहो असा आशावादी सूर आळविला..

शनिवारी सकाळी या उदघाटन कार्यक्रमाला अनेक मान्यवर रसिक या क्षेत्रातले जाणकार उपस्थित होते..आपल्या हातून ही चित्रे काढली जातात..पण मी ती काढत नाही...आता चहा घेण्यासाठीही हात थरथरतो..पण ब्रश हाती घेतला की चित्र रेखाटना तो स्थिर रहातो...जोपर्यंत ती काढली जातात तोपर्यंत मी काढतच रहाणार...असे म्हणत...मंगेश तेंडूलकरांनी आत्तापर्यंत वाचकांनी केलेल्या प्रेमामुळेच हे शक्य झाल्याचे ते सांगतात.

वयाची एंशी पूर्णकरूनही अतिशय उत्साहाने  प्रदर्शन भरवितात...रसिक-वाचकही त्याला तेवढाच दिलखुलास प्रतिसाद देतात...त्यांची याही वयातली ही उमेद तरूणांना आणि नवीन कलावंतांना याकडे आकृष्ट करेल यात शंका नाही...










पुण्यात आजही खड्डे कायम आहेत...मी त्याबाबत व्यंगचित्रकार आणि जागरूक करदाता म्हणून प्रयत्न करतो...पण पुण्याचे हे चित्र महापालिकेतील विविध राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी आणि महापालिकेच्या अधिका-यांनी बदलण्याची गरज असल्याचे सांगत व्यगचित्रातून व्यंग दाखविले..पण ते समाजहिताचे काम व्हावे असाच उद्देश असतो...यात अनेक ठिकाणी अनेक विषयावर मी चित्राच्या भाषेतून मते व्यक्त केली आहेत...पण ती दूर व्हावीत आणि समाजहिताचे काम व्हावे ही आशादायक बाब घडावी ही तेंडूलकरांची विनंती आहे...


- सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, May 27, 2013

कोल्हापूरात रसिक डोलू लागतात..

व्हायोलीन गाते..तेव्हा..


कोल्हापूर- आयपीएलची अंतीम फेरी असुनही काल कोल्हापूरातील संगीत रसिक चारुशीला गोसावी यांच्या व्हायोलीनवरची  किमया पहायला आवर्जुन हजर होते...आणि दादही अशी दिली..की क्या बात है...
क-हाडे ब्राह्मण संघ या कोल्हापूरच्या रौप्यमहोत्सवा निमित्ताने ही खास मैफल देवल गायन समाजच्या सभागृहात दोन तास रंगत गेली...रविळवारी २६ मे २०१३ ला कोल्हापूरला याचा सहावा प्रयोग सादर झाला.

कोल्हापूरच्या पुढारीने म्हटले ..थेट काळजाला भिडणा-या व्हायोलीनच्या सुरांनी गीतांमध्ये गुंफून  पुण्यातल्या   व्हायोलीनवादक चारुशीला गोसावी यांनी रसिकांना ऐन ऊन्हाळ्यात सुरांच्या मैफलीत चिंब होण्याचा  आनंद दिला.

त्यांच्या कार्यक्रमाचा आरंभ श्री रागाच्या वादनाने झाला. नंतर लाकप्रिय मराठी- हिंदी गीतांनी रसिकांना आवडतील अशा  एकाहून एक सरस गीतांच्या सूरांवटींनी रसिकांना त्यांनी मंत्रमुग्ध केले.


संपूर्ण कार्यक्रमाने निवेदन पुण्याचे आनंद देशमुख यांनी केले..त्यानी सूरामागच्या शब्दांतून भावनांची आंदोलने कशी आहेत याची सूत्रबध्द मांडणी करत कार्यक्रमात अधिक रंगतता आणली.
चारुशीला गोसावी यांना तबला आणि ढोलकीची सुरेल साथ केली त्यांचे चिरंजीव रविराज गोसावी यांनी. सिंथेसायझरवर इतर वाद्यमेळ आळविला तो अमृता दिवेकर यांनी..तालवाद्याची नाजूकता जपली ती राजेंद्र साळुंके आणि मधुरा गोसावी यांनी.


पुण्याच्या नावारुपाला आलेल्या एक व्हायोलीनवादिका सौ. चारुशीला गोसावी...यांनी साधारणपणे वर्षापूर्वी आपल्या स्वतंत्र कार्यक्रमाला सुरवात केली. सतंत्र स्वतःचे सोलो वादनाचे कार्यक्रम त्यांनी यापूर्वी खूप केलेत. सुमारे ३००० विविधरंगी गाण्यांच्या कार्यक्रमाला साथही केली आहे.. पण शेवटी स्वतःचा ठसा ..आणि वाद्यावरची आपली तयारी रसिकांच्या  पसंतीस उरतावी यासाठी संच तयार केला ..आजकालच्या प्रसिध्दीच्या जंजाळात त्यांच्या इतर वादनाची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही..तरीही त्यांनी व्हायोलीन गाते तेव्हा..चा कार्यक्रम सुरुच ठेवला. यात हिदी मराठी विविधढंगी गाणी त्या व्हायलीनवर सादर करतात.

क-हाडे ब्राह्मण संघाचे पदाधीकारी आणि देवल गायन समाजचे खास रसिक या प्रयोगाला मुद्दाम उपस्थित होते.

१२ फेब्रुवारी २०१२ ला पुण्यात हेमलकसातल्या डॉ. प्रकाश आमटे यांच्या कार्याला मदतीसाठी पहिला प्रयोग सादर केला..सांस्कृतिक पुणे या सुभाष इनामदार यांच्यामार्फत व्हायोलीन गाते तेव्हा..ला भरघोस दाद मिळाली.. त्यातून जमा झालेली रक्कम सुमारे ७० हजार रुपये आदिवासींच्या आरोग्यासाठी काम करणा-या आमटे कुटंबियांच्या कार्याला देऊन झाले.

कलेसाठी कला हे जरी खरे असले तरी आपल्या कलेची पावती या ना त्या परीने मिळावी अशी सर्वच कलावंतांची सुप्त इच्छा असते.

व्हायालीन गाते तेव्हा..य़ा कार्यक्रमात
  जीवलगा कधीरे येशील तू`,अशी पाखरे येती`..नंतर बरसलेले `श्रावणात घननीळा`ने वन्समोअरची दाद मिळते `काहो धरीला मजवरी राग` सारखी बैठकीची लावणीही रंगत जाते. `जांभुळ पिकल्या झाडाखाली` या जैत रे जैत सारख्या अवघड शब्दांना लिलया व्हायोलीनवर झुलवकत गोसावी ते रंगवत जातात...तेव्हा श्रोते त्यांच्या वादनातल्या कौशल्याने भारावून जावून दाद देतात.  , `बैय्या ना धरो.`.`बाबुजी धीरे चलना` गाण्यांवर  ठेका धरायला रसिक उत्सुक होते....त्या सुरांवटींच्या हिंदोळ्यावर असेच तरंगत रहावे असेही वाटू लागावे इतकी ती उत्तम रसिकांनी कौतुकाने दाद दिली.
 


कार्यक्रमाची अखेर जरी लागा चुनरीमे दाग ह्या गीताने झाली..तरीही प्रेक्षकांच्या आग्रहाखातर चारुशीला गोसावी यांचे गुरु  आणि वडील पं. भालचंद्र देव यांच्या भैरवीने झाली..तोही एक अनोखा मोळ होता...तेच सूर साठवत कोल्हापूरकर रसिक फुन्हा एकदा हा कार्यक्रम ठेवा आम्ीह नक्की येऊ असे आश्वासन देत एकामागून एक आपापल्या दिशेने निघून गेले..


व्हायोनीन गाते तेव्हा...
टाळ्यातून प्रतिसाद उमटतो ..
लोक डोलू लागतात..
भारावलेल्या मनातून सहजपणे दाद येते..
कलावंताचे कौतूक होते..
शब्दांचे सूर बनून ते बोलू लागतात.
ताल आणि लयींचा एकजीव होतो..
पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते...






सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Friday, May 24, 2013

देवल क्लबच्या मंचावर गाणार....व्हायोलीन

चारुशीला गोसावी यांचं....


पुण्याच्या नावारुपाला आलेल्या एक व्हायोलीनवादिका सौ. चारुशीला गोसावी...यांनी साधारणपणे वर्षापूर्वी आपल्या स्वतंत्र कार्यक्रमाला सुरवात केली. सतंत्र स्वतःचे सोलो वादनाचे कार्यक्रम त्यांनी यापूर्वी खूप केलेत. सुमारे ३००० विविधरंगी गाण्यांच्या कार्यक्रमाला साथही केली आहे.. पण शेवटी स्वतःचा ठसा ..आणि वाद्यावरची आपली तयारी रसिकांच्या  पसंतीस उरतावी यासाठी संच तयार केला ..आजकालच्या प्रसिध्दीच्या जंजाळात त्यांच्या इतर वादनाची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही..तरीही त्यांनी व्हायोलीन गाते तेव्हा..चा कार्यक्रम सुरुच ठेवला. यात हिदी मराठी विविधढंगी गाणी त्या व्हायलीनवर सादर करतात.

रविवारी २६ मे २०१३ ला कोल्हापूरला याचा सहावा प्रयोग सादर होत आहे.



१२ फेब्रुवारी २०१२ ला पुण्यात हेमलकसातल्या डॉ. प्रकाश आमटे यांच्या कार्याला मदतीसाठी पहिला प्रयोग सादर केला..सांस्कृतिक पुणे या सुभाष इनामदार यांच्यामार्फत व्हायोलीन गाते तेव्हा..ला भरघोस दाद मिळाली.. त्यातून जमा झालेली रक्कम सुमारे ७० हजार रुपये आदिवासींच्या आरोग्यासाठी काम करणा-या आमटे कुटंबियांच्या कार्याला देऊन झाले.

कलेसाठी कला हे जरी खरे असले तरी आपल्या कलेची पावती या ना त्या परीने मिळावी अशी सर्वच कलावंतांची सुप्त इच्छा असते.

व्हायालीन गाते तेव्हा..य़ा कार्यक्रमात
चांदणे शिंपीत जा`, `अशी पाखरे येती`..नंतर बरसलेले `श्रावणात घननीळा`ने वन्समोअरची दाद मिळते `काहो धरीला मजवरी राग` सारखी बैठकीची लावणीही रंगत जाते. `जांभुळ पिकल्या झाडाखाली` या जैत रे जैत सारख्या अवघड शब्दांना लिलया व्हायोलीनवर झुलवकत गोसावी ते रंगवत जातात...तेव्हा श्रोते त्यांच्या वादनातल्या कौशल्याने भारावून जावून दाद देतात.  `बोलो रे पपी`, `बैय्या ना धरो.`.`बाबुजी धीरे चलना` गाण्यांवर  ठेका धरायला रसिक उत्सुक असतो...त्या सुरांवटींच्या हिंदोळ्यावर असेच तरंगत रहावे असेही वाटू लागते.
पं. भीमसेन जोशी ( माझे माहेर पंढरी) या भारतरत्नांच्या तोंडून गायल्या अभंगाला पेलण्याची ताकद गोसावी यांच्या वादनातून प्रकटपणे दिसते.
शेवची एवढेच म्हणावेसे वाटते..



व्हायोनीन गाते तेव्हा...
टाळ्यातून प्रतिसाद उमटतो ..
लोक डोलू लागतात..
भारावलेल्या मनातून सहजपणे दाद येते..
कलावंताचे कौतूक होते..
शब्दांचे सूर बनून ते बोलू लागतात.
ताल आणि लयींचा एकजीव होतो..
पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते...




सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Thursday, May 23, 2013

विविध पैलू असलेली कला आणि कल्पकता


 एकमेव नाव म्हणजे कृष्णदेव मुळगुंद...


कृष्णदेव मुळगुंद सरांची जन्मशताब्दी २७ मे पासून सुरू होत आहे. यानिमित्तानं त्यांच्याविषयीच्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. 



मनात असते सदैव त्यांच्या

कलागुणांची आस

विकास होतो सहजी त्यांचा

प्रयत्न करिता खास


कृष्णदेव मुळगुंद सरांच्या ड्रॉइंगच्या तासाला त्यांनीच फळ्यावर लिहिलेल्या या ओळी तीन वर्षं मी रोज वाचत असे. रोज वाचून त्या पाठही झाल्या होत्या; पण आता इतक्‍या वर्षांनंतर त्यांचं आकलन होत आहे. त्या वेळी त्या शब्दांचा अर्थ समजला होता; पण त्यामागची मेहनत, ध्यास, झपाटलेपणा आता कुठं लक्षात येत आहे. सरांच्या आयुष्यात ते एक झपाटलेपण होतं! मी या व्यवसायात 35-40 वर्षं काढल्यावर सरांचं ते झपाटलेपण आज मला कळतंय...!

मी सरांच्या सान्निध्यात आले ती शाळेमध्ये. साधारणतः सातवी-आठवीत असताना आमचाच एक वर्ग असा होता, की ज्याला गायन, वादन आणि चित्रकला यांपैकी एक विषय निवडायची मुभा होती. मी चित्रकला या विषयाची निवड केली. तिथं ते आमचे ड्रॉइंगचे शिक्षक होते. माझ्याकडं नृत्याचं अंग आहे, हे सरांना ठाऊक असल्यामुळं त्यांनी मला, "बालनाट्यात काम करशील का?' असं विचारलं. "मंतरलेले पाणी' या नाटकात मला तीन नृत्यं होती आणि भूमिका होती राजकन्येच्या मैत्रिणीची - झुलारीची. या नाटकात ससे, कबूतरं असे खरेखुरे प्राणी-पक्षी स्टेजवर असायचे. त्यांच्याशी खेळताना, त्यांना हातात घेताना खूप छान वाटायचं. प्रेक्षकांनाही त्यांचं भारी अप्रूप असे. या नाटकाच्या तिसऱ्या अंकातला एक प्रसंग अजून माझ्या डोळ्यांसमोर आहे. तो एक ड्रीम सिक्वेन्स होता. त्यात ढग, तारे, नानाविध माळा, पऱ्या आणि बरंच काही होतं. अशा कल्पकतेनं केलेल्या सजावटीमुळे संपूर्ण स्टेज जणू स्वर्ग असल्यासारखंच दिसत असे आणि प्रेक्षागृहातून तर "अय्या।।' "कित्ती मस्तंय...' "व्वा...' "ही।।' "आ।।।' अशा प्रतिक्रिया आम्हाला स्टेजवर ऐकू येत असत. खासकरून मुलांसाठी तर ती एक मोठी पर्वणीच होती. त्यानंतर "जादूनगरीतील राजकन्या' या नाटकात माझी भूमिका नव्हती; पण मी नृत्यात सहभागी होते. अशा प्रकारे नाटकात माझं मन रमलं. "जंगलातला वेताळ', "असा मी काय गुन्हा केला?' अशी काही नाटकंही केली. राजन मोहाडीकर, दीपक माहुलीकर, दिलीप जोगळेकर, मोहन जोशी, शिंदगीकर, लक्ष्मण मंकणी, मनोहर यादव, उदयसिंह पाटील, सुधीर साने...आणि बरीच मुलं... आमचा छान ग्रुप जमला होता.

आपल्या विद्यार्थिदशेत आई-वडील आणि आपले शिक्षक हेच आपल्या सर्वांत जास्त जवळ असतात. माझ्या आई-वडिलांसोबतच मुळगुंद सर आणि बाई हे माझे दुसरे आई-वडील झाले होते. सर माझ्या घरापासून अगदीच जवळ राहायचे; त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा तालमींसाठी सरांच्या घरी नियमितपणे जाणं-येणं सुरू झालं. बाईंबरोबर स्वयंपाकघरातही लुडबुड सुरू झाली. सरांचं घर हे माझ्यासाठी जणू दुसरं घर होतं. आता या सगळ्याचं खूप नवल वाटतं... सरांचा संसार तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये नटला होता. वाड्यात शिरल्या शिरल्या गेटच्या उजवीकडं बैठकीची एक खोली. पुढं गेल्यावर वाड्यात स्वयंपाकघर आणि वाड्यात अंगणाच्या डावीकडं जिन्यावरून पहिल्या मजल्यावरती अभ्यासाची खोली. ती खोली म्हणजे "अलिबाबाची गुहा'च होती. इथं सरांचा हरहुन्नरी स्वभाव जवळून पाहायला मिळाला.



सरांचं अक्षर तर सुंदर होतंच, तसंच त्यांचं लेखनही. त्यामुळं नाटकाचं संपूर्ण स्क्रिप्ट पाठ व्हायचं. सरळ, सोपी तोंडात बसणारी भाषा. इतकंच नाही तर नाटकाचे सर्व दागिने, अगदी मुकुट, गळ्यातले हार, मनगट्या, कंबरपट्टे सर्व सरांनीच हातानं बनवलेलं असायचं आणि त्याला सामग्री काय, तर पुठ्ठे, बेगड, तऱ्हेतऱ्हेची पदकं, ब्रश, सोडावॉटरचे बिल्ले...! पण तो "दागिना' तयार झाला, की इतका मस्त दिसायचा! जणू खराखुराच आहे की काय, असं वाटे. एकीकडं शिक्षक, चित्रकला, नाट्यलेखन, नृत्य, नृत्याचं गीतलेखन, वेशभूषा अशी विविध पैलू असलेली कला आणि कल्पकता सरांनंतर कुणामध्येच एकत्रितरीत्या पाहायला मिळाली नाही.

खरं तर सर मूळचे चित्रकार आणि नर्तक. ते नृत्य बसवायचे आणि आमची शाळा "फोक डान्स कॉम्पिटिशन'मध्ये नेहमी पहिली यायची. सरांनी मणिपुरी, नागा, सिलोनी, रशियन, कोळीनृत्य, कातकरी, भिल्लनृत्य अशा साधारणतः 30 लोकनृत्यांचं काव्यलेखन, त्यांची वेशभूषा आणि दिग्दर्शनही केलं होतं. त्यातल्या काही गीतांना राम कदम, दादा चांदेकर, मनोहर केतकर यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारांनी चाली बांधल्या होत्या. पुण्यात मुलींच्या भावे स्कूलमध्ये (म्हणजे आत्ताची रेणुका स्वरूप शाळा) प्रवेश करण्यापूर्वी मी सरांची लोकनृत्यं पाहिली होती. त्यामुळं हायस्कूलमध्ये येताना माझ्या मनात त्याचं मोठं आकर्षण होतं. पण मी ज्या वर्षी पाचवीत गेले, त्याच वर्षी आमच्या शाळेनं स्पर्धेत भाग घेणं बंद केलं. त्यामुळे माझा विरस झाला होता; पण सुदैवानं नाटकात काम करायची संधी मिळाली आणि मला वेगळी दिशा मिळाली. मी शाळेच्या शेवटच्या वर्षात पोचले. त्यानंतर मॅट्रिक, कॉलेजमध्ये सायन्स शाखा, एनसीसी. त्यामुळे वेळ कमी मिळायला लागला. पुढं मी राष्ट्रीय नाट्य विद्यालयात गेले. पुण्याला येणं कमी झालं आणि सरांकडं जाणंही कमीच झालं. सरांचे सगळे विद्यार्थी पुढं गेले. आपापली वाटचाल करू लागले; परंतु "सर कुठं असतील? काय करत असतील?' याचा विचार माझ्या मनात यायचा. मात्र, माझ्या कामाच्या वाढत्या व्यापामुळं, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळं मनात असतानाही सरांशी पुढं तितका संपर्क राहिला नाही. आता सर नसताना मात्र त्याची जास्तच जाणीव होत आहे आणि सरांशी पुढं आपला संपर्क तेवढा राहिला नाही याचा सल राहून राहून मनाला बोचत आहे; पण बालपणात जे आपल्याला मिळतं, ते आयुष्यभर पुरतं. बालपणात माझ्या मनावर जे चांगले संस्कार झाले, त्यात मुळगुंद सरांचा वाटा मोलाचा आहे.

सरांनी "घाशीराम कोतवाल', "जाणता राजा' या नाटकांसाठी नृत्यदिग्दर्शन केल्याचं कळलं होतं, तेव्हा मला खूप बरं वाटलं. त्यांना त्यांच्या आवडीचं काम करायला मिळालं; पण ते प्रसिद्धिपराङ्‌मुखच राहिले. सरांनी जी नृत्यं बसवली त्या नृत्यांचं किंवा त्या स्टेप्सचं कुणीच कुठंही डॉक्‍युमेंटेशन केलं नाही. त्यामुळं पुढच्या पिढ्यांचं बरंच नुकसान झालं, असं मला वाटतं. मात्र, त्यांचा नातू कवी-गीतकार वलय मुळगुंद हा आजोबांचं भरीवकार्य समाजापुढं आणत आहे, नव्या पिढीपर्यंत पोचवत आहे. 



-रोहिणी हट्टंगडी, मुंबई
( `सकाळ, सप्ततरंग`  च्या सौजन्याने)

 

Wednesday, May 22, 2013

मनोरंजनाच्या दालनात दिमाखदारपणे मिरविणार.. खो खो



सिध्दार्थ जाधवसह अनेक पूर्वज च्या आपल्या जुन्या वाड्यात रहायचे..त्या वाड्यात त्यांचा वंशज असलेला श्रीरंग देशमुख रहायला येतो..आणि एकेक पीढीचे एकेक पूर्वज आपला खेळ खेळू लागतात...
 लोच्या झाला रे... या नाटकावर आधारीत हा सिनेमा काही विलक्षण दृष्य़े..पारंपारिक पिढी बरोबर चालत आलेले लोकसंगीत आणि त्याला लाभलेला अभिनयासह नृत्याचा थाट...



केदार शिंदे यांच्या तीन वर्षाच्या खंडानंतर एक जंगी मराठी सिनेमाचा खेळ ते घेऊन येताहेत...खो खो...





हा सिनेमा हा पूर्वसुरींच्या साम्राज्यात जावून काही त्या त्या पिढ्यांचा घटना आणि प्रसंग  वेगवेगळ्या सिनेमॅटिक पध्दतीने यात दिसतात.. सारी खास दृष्ये तुमची नजर आणि मन प्रसन्न करतील..


 या महिन्याच्या ३१ तारखेला हा केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट वेगळीच गंमत मराठी प्रेक्षकांना या चित्रपटातून दाखविणार आहे. त्यांना प्रेक्षक आपला हा चित्रपट मनोरंजनाचा नवा खजाना म्हणून नक्कीच अनुभवतील याची खात्री वाटते.  पुण्यातल्या पत्रकार परिषदेत त्यांनी खास या चित्रपटाच्या प्रसिध्दी साठी उषा उत्थप यांनी तयार केलेले गीत ऐकविले..निर्मात्या शोभना देसाई यांनीही केदारच्या नेतृत्वाखालील ही टीम यांनी खो खो तून तयार केलेली कलाकृती मराठी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा आशावाद व्यक्त केला.
सिध्दार्थ जाधव यांनी एकही संवाद नसलेली भूमिका करताना केदारच्या दिग्दर्शनातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाल्याचे सांगितले.. माझ्या थोरल्या भावासारखा असलेला  भरत जाधव मोठा कलाकार तर आहेच पण आपल्या इतर सहका-यांनीही प्रत्यक्ष चित्रिकरणात पंचेस सांगून प्रसंग खुलवितो.हे ही स्पष्टपणे सांगितले.

विजय चव्हाण यांची भूमिका काही प्रसंगातून नक्कीच प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणी आणेल इतकी उत्तम सादर केल्याचे प्रशस्तीपत्रक भरत जाधव यांनी दिले. त्याच्या मते केदारच्या गोष्टीत गंमत असते. त्यात तो परिपूर्ण असतो. गोष्ट स्वतःची असल्याने त्यात अनेकविध गोष्टीची भर सहजपणे पडते...आणि सर्वात महत्वाचे म्हणचे त्याच्या चित्रपटात काम करणे म्हणजे  उत्साहाला अधिक वेगळा आकार मिळतो..




सुवासिनी या मिलिकेत दिसलेली पुण्याची प्राजक्ता माळी हिचेही या चित्रपटाद्वारे पहिले पदार्पण आहे.तिच्या मते...केवळ चांगले दिसणे..छान कपडे घालून मिरविणे नाही..यात अभिनयाला भरपूर जागा आहे..केदार शिंदे यांनी अनेक प्रसंगी `वाह क्या बात है` असे स्पष्टपणे सांगावे उत्तमपणे सादर केले आहेत. माझ्याबरोबर सारीच मोठी कलावंत मंडळी यात असूनही त्यात माझा नवखेपणा  कधीच निघून गेला..मला खूप आवडले या चित्रपटात काम करायला.. प्राजळपणे प्राजक्ता बोलत होत्या..



भन्नाट कथानक...उत्तमोत्तम तांत्रिकता ..ओठांवर रेंगाळावीत अशी गाणी..आणि सुरेश देशमाने यांचे छायाचित्रण..शशांक पोवार यांचे संगीत आणि चेतन देशमुख यांचे स्पेशल इफेक्ट...सारेच खो खो या चित्रपटाला मनोरंजनाच्या दालनात दिमाखदारपणे मिरविणारेच आहे..


पाहू या ३१ मे ला प्रत्यक्ष चित्रपटगृहात...




-सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276







Tuesday, May 21, 2013

विनया देसाई-फुलं गोवणारा धागा



सौ. विनया देसाई..



गेली २५ वर्षे त्या शब्दांचे पूल बांधतात..त्यावरुन रसिक आणि गायक, वादक, साहित्यिक सहजपणे कार्यक्रमाला सामोरा जातो. ही शब्दांची किमया अभ्यासपूर्ण रित्या त्यांनी जोपासली..आणि आपल्य़ाच सोप्या, साध्या आणि सात्वीक शैलीत त्यांनी आकार दिला...


तसे प्रत्येक क्षेत्र तुमची परिक्षा घेणारे..तरीही हे अधिक ..चोखंदळ आणि संवेदनाशील..
इथे काही काळ तुमची स्त्वपरिक्षा असते...ती रसिकांसमोर..ती जिंकलात तर टाळ्या..निराश केले तर मात्र तिटकारा...
भाषेकडे लक्ष. संर्दभाची जाण.. मागच्या गीताची गेलेली आठवण साठवत पुढील दृष्यात्मक  भागाकडे आकर्षीले जाईल असे..भाष्य....त्यात प्रत्येकाची नावे यथायोग्य सांगायची जबाबदारी...



एकूणच निवेदक वा सूत्रसंचालकांचा दबावही असतो आणि दाबही..








एका लेखात त्या लिहितात...
समोरच्या रसिक प्रेक्षकांना आनंद देण्याचा हा सोहळा मी अनेकदा अनुभवलाय. सरीवर सरी बरसल्या अशा गाण्यांची  मैफल असो किंवा मोगरीच्या फुलांप्रमाणे उमललेली ताजी टवटवीत जुनी भावगीतं असो..त्यात निवेदनाने रंग भरला. फुलं ओवायला धागा हवा तसं गाण्यांची फुलं गोवणारा धागा झाले. ...



सूत्रसंचालनातला आनंद तर शब्दात न मावणारा. प्रमुख पाहुणे, अध्यक्ष या नात्यानी किती दिग्गज भेटले..याची गणतीच नाही..







एकूणच या क्षेत्रात कोट्यावधी हशें आणि तेवढ्याच कानात साठवाव्यात एवढ्या टाळ्या मिळविले..ते काम स्वतःसाठी नाही ते त्या सादरकर्त्य़ा कलावंतांसाठी..साथीदारांसाटी..साहित्यिकांसाठी..

मूक-बधीर अशा मुलांच्या ज्ञातात विज्ञान रुजविण्याची कामगिरी..बीएससी नंतर निवडली..याही क्षेत्रात शब्दावीना संवाद करायची जादू उमटवली .त्या क्षेत्रातली त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली.

केवळ शब्दांनी कार्यक्रमाची बहारदारता वाढविली असे नाही..तर साहित्य वाचता वाचता स्वतःही साहित्यिक बनल्या...त्यांच्या नावावर आठ पुस्तकांच्या नोंदी आहेत. तशा मितभाषी असल्या तरी मनातून सतत बोलत असतात..घर-संसार-शाळा आणि उरलेल्या वेळात निवेदनाची जबाबदारी पेलताना घरच्यांचं तेवढेच मोलाचं पाठबळ उभे आहे...त्या सा-यांना याचा अभिमान आहे...आम्हालाही आहे..



हे सारे करताना स्वतःमधला कलावंत जागविला.. अनुभवांचे संचित ``आनंदयात्री` या एकपात्री प्रयोगाच्या निमित्ताने त्यांनाच अर्पण केले.. आज त्याचेही चारशेच्यावर कार्यक्रम झालेत.
२२ मे २०१३ ला संध्याकाळी त्यांच्या या कर्तृत्वाचा जागर होणार आहे... देताना जे दिले..त्यातले कांही अनेकांच्या उपस्थितीत पुढे दिसणार आहे...
आज आपण सारे या निवेदन क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलेला सलाम करुया...हिच उमेद..हेच संचित घेऊन..अखेरपर्य़ंत आयुष्याच्या मैफलीत अनेक धागे गुंतवित..त्यातला एक धागा आपणही आळवूया...




जमविलेले सारे
आज डोळ्यासमोर दिसते आहे
घडलेल्या सा-या क्षणांचे
चित्र स्पष्ट उमटले आहे
संवादाने साधलेली किमया
आज पुढे ठाकली आहे
विनयाने..अभिमानाने
वाटचाल तर पुढेच करायची आहे..




- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
95525926726