संपूर्ण दीपरामायण लिहिणे हा कलियुगातील एक चमत्कारच म्हणावा इतकी महत्वाची घटना मानावी लागेल..इतका निरागस व्यक्तीमत्व लाभलेला माणूस पुराणकाळातील वाटावे असे महाकाव्य लिहिल असे वाटत नव्हते...या इति कर्तव्याची पूर्ती होण्यासाठीच त्यांचा जन्म झाला होता असे वाटते. असे ग्रंथ आजकाल कुणी प्रकाशित करणारा नाही..ते सकाळ प्रकाशनाने प्रसिद्ध केले हाही एक चमत्कार असल्याचे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त करून या ओवीबद्ध ग्रंथाची महती स्पष्ट केली.
संगणकाच्या १ लाख ६३ हजार ५०३ शब्दांचा उपयोग करून आणि १०, २२६ ओव्या रचून ४२६ पृष्ठांचे स्वालिखित संपूर्ण दीप रामायण १० मार्च २०२३ रोजी दीपक करंदीकर यांनी पूर्ण केलेला हा ग्रंथ सकाळ
प्रकाशनाच्या वतीने आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुढाकाराने २० एप्रिल २५ रोजी डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते आणि आनंद माडगूळकर आणि प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात प्रकाशित झाला.. यावेळी डॉ. मोरे बोलत होते.
महिपती सारख्या काळात जाऊन त्यांनी ते ओवीबद्ध स्वरूपात लिहिले हे आणखी एक या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. लुप्तप्राय होत असलेल्या प्राचीन छंदामध्ये दीपक करंदीकर यांनी हा ग्रंथ लिहिला ही आजच्या साहित्य इतिहासातील मोठी अभिमानाची गोष्ट आहे..असेही मत डॉ. मोरे यांनी यावेळी अधोरेखित केली.
दीपक करंदीकर यांनी या विषयाचा सांगोपांग अभ्यास केल्याचे या पुस्तकातील ओव्या वाचताना जाणवते..रामायणातील उपकथानके त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने इथे ओव्यांमधून कथन केली आहेत..प्राथमिक शिक्षण घेतलेल्या माणसाला अतिशय सोपी वाटावी अशी भाषा वापरून त्यांनी अतिशय व्यासंगी असा ग्रंथ लिहिला असल्याचे गदिमा पुत्र आनंद माडगूळकर सांगतात. हे त्यांच्या हातून घडले हे गेल्या जन्मीचे
पुण्यच म्हणावे लागेल.
अनेक घरात या ग्रंथांची नियमित पारायणे होऊन हा ग्रंथ सिद्ध होईल याची माडगूळकर यांना खात्री वाटते.
दीपक करंदीकर यांच्या उत्तम गझल रचनांना उल्लेख करून प्रा. मिलिंद जोशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांचा हा प्रतिभावंत म्हणून झालेला प्रवास म्हणजे गझले कडून महाकाव्याकडे झालेला प्रतिभेचा प्रवास महत्वाचा असल्याचे ते आवर्जून सांगतात.
श्रीरामाचे आपल्या समाजात किती महत्व आहे यांचे वर्णन करून जोशी यांनी आपल्या सांस्कृतिक संचिताचे नवसर्जन करन करून अशा प्रकारच्या कलाकृती निर्माण करणे यासाठी सुद्धा एका प्रकारची प्रतिभा लागते..ती दीपक करंदीकर यांच्याकडे होती. जशी गदिमा यांनी चित्रपट गीते.. सांगीतिका यापद्धतीने ते गीतरामायणा पर्यंत येऊन पोचले तसा दीपक करंदीकर यांचा प्रवास देखील कविता, गझल, गद्यलेखन ते दीप रामायण असा प्रवास झाल्याचे मिलिंद जोशी सांगतात. भाषेचे सौंदर्य, कल्पनेचे वैभव आणि उदात्त विचार या तीन गोष्टी एकत्र आल्या तर त्याच्या रसायनातून किती उत्तम कलाकृती निर्माण होते याचे दीप रामायण हे उदाहरण असल्याचे मत जोशी मांडतात.
यावेळी साहित्य परिषदेच्या कोशाध्यक्ष
सुनीताराजे पवार आणि आमदार हेमंत रासने यांनीही करंदीकर यांच्या विषयी आपले विचार बोलून दाखविले..
कविवर्य सुरेश भट यांचे शिष्य दीपक करंदीकर यांनी रामायणातील कथानकावरून ओवीबद्ध रचलेले दीपरामायण या महाकाव्याचे प्रकाशन ज्येष्ठ संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते मंगळवारी मसापच्या सभागृहात करण्यात आले.
दीपक करंदीकर यांच्या निधनानंतर सुमारे वर्षभराने ह्या महाकाव्याचे प्रकाशन सकाळ प्रकाशनाच्या वतीने प्रसिध्द केले गेले. कार्यक्रमात मसापचा मोठा वाटा होता. प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष होते मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि प्रमुख पाहुणे म्हणून आनंद माडगुळकर उपस्थित होते. कसबा पेठेचे आमदार हेमंत रासने कार्यक्रमासाठी खास हजर होते. तसेच मसापच्या कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
अमृता देसरडा.. यांनी सकाळ प्रकाशनाच्या वतीने प्रास्ताविक केले.
सकाळ प्रकाशनाचे..आशुतोष रामगिर,
दीपक करंदीकर यांचे कुटुंबीय आणि करंदीकर प्रेमी..आणि साहित्यिक प्रेमी हजर होते..
No comments:
Post a Comment