Thursday, October 11, 2012

निर्णय दोघांनी घ्यायचे...




संसारात दोन मनं जशी जुळावी लागतात..
तशी दोन नाती अलगद हाताळावी लागतात..

इतरांसमोर खोटं नाटक करता येतं..
एकमेकांसमोर ते मुखवटे गळून पडतात..
 खरी वेदना चेहरा बोलून टाकतात...
तो हळवा असेल..तर तो ते ओळखतो..

तिच्यात जात्याच थोडे खंबीर अधिक असते..
निर्णय दोघांनी घ्यायचे... समजावून
त्यात तू तू मै होणार नाही.
गैरसमज होणार नाही..काळजी घ्यावी..

सगळेच हळवेपण जपणारे नसतात..
त्यांना कधी काय सांगायचे ते त्या जाणातात..
म्हणून तर संसार टिकतो..सांभाळला जातो..
याला जीवन .म्हणजे तडजोड नाव आहे...

अनेकांचे आयुष्य यानेच तर व्यापलेले..
छोटी स्वप्ने..बाळगून ती साथीने पुरी करा..
दोन्ही चाकं बघा कशी धावायला लागतील..



इति- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: