Wednesday, August 1, 2012

शब्द कधी कधी धोका देतात..


शब्द कधी कधी धोका देतात..
सांगायचे ते उमटवितच नाहीत..
नको तेच सांगत सुटतात..
गैरसमजायला कारण शब्द हेच असतात..

शब्द जसे सांधतात तसेच ते तोडतातही
शब्दांना स्वतःची धार नसते..
पण धग नक्कीच असते..
ती नेमकी पोहोचते..त्या मनी
म्हणून जरा जपूनच वापरा
हे शब्दाचे शस्त्र..


सुभाष इनामदार,पुणे

Monday, July 23, 2012

आधाराचे प्रेम आणि सहवासाचे प्रेम..


विशेषतः स्त्रीच्या आयुष्यात प्रेमाची दोन प्रकारे विभागणी होत असावी...एक पतीकडून मिळालेले आधाराचे प्रेम ..आणि दुसरे तिला हवे असते ते मिळत नाही..ते सहवासाचे प्रेम..

कदाचित काहींना हे दोनही एकाच व्यक्तिकडून मिळतात..तर काही दुस-या प्रेमाला पारख्या होतात.



बहुधा काळाच्या ओघात जे हवे असते..ते फारले लाभत नाही..पण जे लाभते तेच प्रमे समजून जपले जाते..आयुष्यभर टिकविले जाते...



मात्र ज्यांना सहवासाचे प्रेम लाभते..त्यांना एकीकडे घराचा आधार असतो..तरीही मानसीक आणि बौध्दीक दृष्टीने त्या समाधानी नसतात...त्यांना हवे असते त्यांच्या पातळीवर राहून त्यांना समजून घेणारे... सहवासाची भुकेली स्त्री ते हे प्रेम आयुष्यात शोधत असते...जे ती कायमचे मनात साठवून ठेवते...त्याच्य़ाशी प्रतारणा करत नाही...
कारण ते तिचे अंतरीक भान असते....




subhash inamdar, pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

जमेल तेवढे पाळा..


काळाचे बदल मान्य करुन स्विकारायला हवेच. पुरातन परंपरांना नाहक जतन करुन त्या अंधश्रध्देने पाळून त्यावर उगाचच धर्माचे भाकड कथानक ऐकवून समाजाला गुंतून ठेवणांचे दिवस गेलेत. आज काळ वेगळा आहे. सारे व्यवहार वेगळे झालेत. नाती, मैत्र, शेजारी, वाडे सारेच निसरडे झालेत. तुम्ही मान्य करा वा नका करू.. सारे जग कुणासाठी थांबत नाही..ते धावतेच आहे...बदलत्या परिस्थिशी सामना करायला घरातले प्रत्येक जण कमावते होण्याचा हट्ट् करतयं.. ती काळाची गरज आहे...
शेतात पिके घेणारे शेतकरी आता...तसे गावाकडचे राहिले नाहीत. शैताचा कस बदलला. रासायनिक शेतीचे प्रमाण वाढलय...




पटेल तेवढे करा..
आवश्यक तसे वागा..
जमेल तेवढे पाळा..
फक्त इतरांकडे पहा...



subhash inamdar,pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

Sunday, July 22, 2012

वाट पहाणारा..आणि वाट दाखविणाराही..



आपली वाट शोधत कुणी आला तर त्याला आसरा द्यावा
जमल्यास थोडा संवादही करावा...
मात्र सल्ला देण्याच्या फंदात पडू नये...

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कुणीतरी ऊभा असतो...वाट पहाणारा..आणि वाट दाखविणाराही..



केवळ आपण त्याची मदत घ्यावी..पण स्वतःच स्वतःची वाट शोधावी तरच यश नक्की असते...



इति- सुभाष इनामदार, पुणे

Subhash Inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

Wednesday, July 18, 2012

बहारदार अभिनयाचा अस्सल कलावंत हरपला





हिंदी चित्रपटसृष्टीतला खरा सुपर स्टार आज काळाच्या पडद्याआड झाला. त्यांच्या चित्रपटांनी आनंद तर दिलाच पण एक बहारदार अभिनयाचा अस्सल कलावंत हरपला.

आजच्या तरुण पिढीलाही त्या नावाचे आकर्षण होते. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या कर्तृत्वाने बॉक्स ऑफिसवर हाउस्फुल्ल चा बोर्ड झळकवणारा खरा कलाकार हरपला..

त्यांच्या अभिनयाचे कधी कधी चेष्टा व्हायची..पण त्यांची ती तीरकी हसरी मुद्राच आजही आठवणीत राहिली.



अंदाज मधली त्यांची आदाकारी..अमिताभ बच्चन आणि त्यांची चित्रपटातली दृष्य़े आजही डोळ्यात पाणी आणतात.

भाउकपणा आणि आणि हळवी नजाकत ही त्यांचे वेगळेपण होते...त्यांच्या जाण्याने `जिंदगी एक सफर है सुहाना ..यहॉं कल क्या होगा किसने जाना..`हेच खरं... त्यांच्या स्मृती साठवतच हिंदी चित्रपटसृष्टी हळहळत राहिल..तसेच त्यांचे कोट्वधी चाहते...



त्यांचे व्यसन त्यांना अखेरपर्य़त साथ देत गेले....दारु...य़श पचवून स्वतःला सिध्द करण्याची ताकद होती..पण..

त्यांना श्रध्दांजली!



subhash inamdar,pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

Friday, July 13, 2012

थोडे स्वतःसाठी..थोडे इतरांसाठी..


खरे तर साधेपणाने जगणे ही आजच्या काळाची गरज आहे...स्वतःसाठी नाही तर समाजासाठी..पण प्रत्येकाची साधेपणाची व्याख्या निराळी आहे.
आमचा एक मित्र तर कोकणात...लाईट नसलेल्या घरात...स्वयंचलीत दुचाकी न वापरता..निसर्गात जगतो...त्याच्या दृष्टीने आपण शहरातले लोक फार चैनीत जगतो..
आनंद तुम्ही घेताना पैशाकडे पाहू नका...पैशासाठी काहीच करु नका...तुम्ही कराल त्यातून पैसा मिळाला पाहिजे..तोही सहज...
भूक प्रत्येकाला आहे...चांगले रहावे असेही त्याला वाटत असते...याचे दोन्हीचे परिमाण एकच आहे.
चैन म्हणजे ऐशोआराम नाही...शरीराचे लाड कराल त्याबरोबरच मनाचीही श्रीमंती पहा...तुम्ही घेतलेला आनंदच ते सांगेल..तो आनंद म्हणजे सुख..ते काही दूर नसते...तुमच्यापाशीच असेते. दिसते दूर पण तिथेच असते...फक्त त्याचा शोध घेतला पहिजे...


------------------------------------------
राग घेऊन स्वतःला त्रागा करुन घेण्यापेक्षा ..राग आत ठेऊन वरुन संभावीताचे सोंग आणणे योग्य..
यामुळे बाहेरचे सारे वातावरणही चांगले रहाते. तुमचे मन शांत होते...कदाचित जो तुमच्यावर रागावला असेल..त्याचाही उद्देश तो नसतो...कदाचित तोही इतर विचारांनी आधीच व्यापलेला..म्हणून तो दुराव्याने वागतो....
चांगले हेच की शत्रुला मित्र करणे
कारण तो शत्रु नसतो...तो गैरसमज असतो...
थोडा गर्व असतो...
काहीप्रमाणात स्वार्थही..
आपल्याला परमार्थ गाठायचा आहे....सारेच मिळवायचे आहेत...सा-यांशी संबंध वाढवावयाचे आहेत.




--------------------------------------------
आपले कोण ? एक सतत पडणारा प्रश्न आहे...प्रत्येक घटनेतून वेगवेगळी उत्तर सापडतात...प्रसंगातून हे कळते...खरे आकलन होते. तेही अगदी वेगळे...चेहरे दिसततात..पण त्यामागचे मनाचे डोळे् ओळखणे खरेच कठीण...आजचा जवळ वाटणारा..उद्या तुमच्यापासून दूरावलाही जावू शकतो... कदाचित ज्यांच्या जवळ जायची इच्छा असते...त्यांच्याजलऴ जायचा अपूर्य योग अचानक येतो...आणि सारे बदलू पहाते...तुमचे काय?


------------------------------------------------

चेहरे अनेक फसवतात
हसवतातही...
चेह-यावरुन भावना पसरुन राहतात
विरुनही जातात,,
हेच चेहरे आयुष्यात बोलायला लागतात
खरं सारं..सागंत जातात..

-------------------------------

कोणत्याही वयात तुम्ही विद्यार्थी बनू शकता..फक्त त्यासाठी हवी सच्ची मेहनत. शिकण्याची वृत्ती आणि गुरुच्या मार्गदर्शनावर श्रद्धा...शिक्षणासाठी तेही कलेच्या बाबतीत..गुरु लहान असला तरी चालेल..पण त्याकडे तेवढी कला देण्याची ताकद हवी....गुरुपौर्णिमेच्यामित्ताने अनेक कार्यक्रम विविध ठिकाणी झडताहेत ..वेगवेगळे लोक गुरू म्हणून समोर येत आहे..तसे विद्यार्थीही....आज खरेपणा अधिक आवश्यक आहे.

----------------------------------------------------

माझे म्हणून काही पाहिन आता लवलाही
या देही एकच धागा सुखनैव तो दिसावा

------------------------------------------

खांद्यावरी टाकली घोंगडी
फिरला तो रानोरानी
आसुसला अवघा तो
नाही मिळे कोठे गुरु
तरी सावरे रे....

---------------------------


जातानाही कधी कोणाला दुखवू नका रे..
कोणाची कशी मदत होते कसे सांगू रे..
दूरचा शत्रुही वेळेला मित्र बनतो रे..
खाल्ल्या अन्नाला जागणाराही कधी उलटा पडतो रे.......

--------------------------------------------
आयुष्य घडण्यासाठी योग्य गुरुची आवश्यकता नक्कीच असते..तो शिक्षक, आई-वडील, साथीदार नाहीतर मित्रही असू शकतो...मित्र कोणाला म्हणायचे...जो सुख-दुःखात तुमच्या सोबत असतो....आयुष्याच्या प्रत्येक वळणावर..जो तुम्हाला योग्य वाटेकडे घेऊन जातो...तो तुमचा गुरु म्हणायला हरकत नाही..आज असे मित्र फार कमी असतात..जे सतत तुमच्या तुमचे हित...तुमची चिंता याची सतत त्यालाच जाणीव असते..

मित्राची साथ तोच दाखवितो आयुष्याची दिशा...तोच घडवितो..तो बिघडवितोसुध्दा ..आज चैनिच्या जमान्यात मित्र भेटतात ते स्वतःची शान मिरविणारे..स्वतःची हौस भागविण्यासाठी दुस-याची साथ घेणारे...सच्चा मित्र तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा धरत नाहीत.ते फक्त मित्राचे हित पहतात..
आज गुरूच्या आठवणी आळविण्याच्या त्यांची पूजा करण्याचा दिवस... ज्याची करावी सेवी..त्याचा खावा मेवा... आज ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही...सल्ला देणारे खूप आहेत..पण तुमची इच्छा..तुमचे शिक्षण आणि तुमचा अनुभव या सर्वांचा विचार करुन तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी तुमचा विचार करतो...तुमचे हित पहातो....म्हणूनच तो गुरू म्हणून संबोधणे योग्य होईल...

गुरूचा विश्वास आणि गुरूची शाबासकी मिळविणे फार कठीण..तो मवाळही हवा...पण प्रसंगी कठोर व्हायला हवा..दिशा देता देता...स्वतःघडतो आणि तुम्हालाही घडवितो...

असावे गुरूचे ते ज्ञान..
परि असावे सारे सज्ञान..
करुनी दिव्यदृष्टीचे आकलन...
सर्वांसाठी..

सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276




इति...
.सुभाष इनामदार,पुणे

Monday, July 2, 2012

खरा गुरु..खरा मित्र...


आयुष्य घडण्यासाठी योग्य गुरुची आवश्यकता नक्कीच असते..तो शिक्षक, आई-वडील, साथीदार नाहीतर मित्रही असू शकतो...मित्र कोणाला म्हणायचे...जो सुख-दुःखात तुमच्या सोबत असतो....आयुष्याच्या प्रत्येक वळणावर..जो तुम्हाला योग्य वाटेकडे घेऊन जातो...तो तुमचा गुरु म्हणायला हरकत नाही..आज असे मित्र फार कमी असतात..जे सतत तुमच्या तुमचे हित...तुमची चिंता याची सतत त्यालाच जाणीव असते..

मित्राची साथ तोच दाखवितो आयुष्याची दिशा...तोच घडवितो..तो बिघडवितोसुध्दा ..आज चैनिच्या जमान्यात मित्र भेटतात ते स्वतःची शान मिरविणारे..स्वतःची हौस भागविण्यासाठी दुस-याची साथ घेणारे...सच्चा मित्र तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा धरत नाहीत.ते फक्त मित्राचे हित पहतात..
आज गुरूच्या आठवणी आळविण्याच्या त्यांची पूजा करण्याचा दिवस... ज्याची करावी सेवी..त्याचा खावा मेवा... आज ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही...सल्ला देणारे खूप आहेत..पण तुमची इच्छा..तुमचे शिक्षण आणि तुमचा अनुभव या सर्वांचा विचार करुन तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी तुमचा विचार करतो...तुमचे हित पहातो....म्हणूनच तो गुरू म्हणून संबोधणे योग्य होईल...

गुरूचा विश्वास आणि गुरूची शाबासकी मिळविणे फार कठीण..तो मवाळही हवा...पण प्रसंगी कठोर व्हायला हवा..दिशा देता देता...स्वतःघडतो आणि तुम्हालाही घडवितो...

असावे गुरूचे ते ज्ञान..
परि असावे सारे सज्ञान..
करुनी दिव्यदृष्टीचे आकलन...
सर्वांसाठी..



सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Tuesday, June 19, 2012

पैसा आहे..पण स्वास्थ्य हरवले...



आपल्या आयुष्यातली कसरत सतत चालू असते. जेव्हा पगार कमी होते तेव्हा आपोआपच खर्च बेतासबात होता. पण जेव्हा मध्यमवर्गीय म्हणून आपण गणले जातो, तेव्हा एकेक व्यसने लागतात. आणि ती एकदा लागली की सुटत नाही...ही व्यसने तसली नाही...

घरात वीज नव्हती तेव्हा इतरांचा हेवा वाटायचा...पण आज घरोघरी वीज आली..मग वीजेवरची उपकरणे आली. टी.व्ही. फ्रीज, वॉशिंग मशीन, संगणक, मोबाईल, फोन.... पुढे या सगळ्याची इतकी सवय झाली की वीज पाच मिनीटे गायब झाली तरी बेचैन व्हायला होते. मग त्यासाठी इनव्हर्टर आला. चोवीस तीस वीज...

तीच गोष्ट घराची. भाड्य़ाच्या घराची घरमालकाची कटकट नको म्हणून स्वतःचा फ्लॅट आला. आता त्यासाठी कर्ज आले. ते फेडायचे म्हणून घरातल्या सर्वांनी नोकरी करायची..

बाहेर जायचे मग स्वतःचे दुचाकी वाहन हवे.... बस वगैरे...छे छे...नको रे बाबा! आता पेट्रोल...दर विचारु नका..८० रु. लिटर...

पूर्वी आंबा रायवळ..गावरान चालायचा..आता लागतो हापूस..तोही रत्नागिरी बरं.. आता मग तो रत्नागीरी समजून आपल्या गळ्यात व्यापा-याने मारल्यावर दोष कुणाला?

परिस्थितीमुळे खाण्याची आबाळ..आता..सतत..जे हवे ते..मिळते.. ते ही केव्हाही ,,कुठोही खात येते...मालिका पाहतानाच खाणे ही तर सवय...मग मालिकेकडे लक्ष..खाणे चाऊन खाणे.दूर..मग पोटाच्या तक्रारी सुरु...
लवकर निजे..लवकर उठे..तया आरोग्य संपत्ती भेटे.... आता कुठे..उशीरा झोपे..सावकाश उठे.... सर्रास सुरु.. पित्त, पोटाच्या तक्रारी..सारे आले...

डॉक्टर आले...पण ते आता मल्टीस्टोरेज हॉस्पिटल मध्ये...फॅमिली डॉक्टर..कमी झाले. त्याचा खर्च वाढला...
पैसा आहे..पण स्वास्थ्य हरवले...असे जीवन झाले आहे...सारे जण पळताहेत...रस्त्यावर जाताना अपघात झाला तरी त्याकडे डोळेझाक करुन आपली गाडी ऑफिस पकडण्यासाठी धावतोय..

असे जीवन..अशी सवय.... अनेक सांगता येईल..पण इथे थांबणे योग्य!



( खरं तर हे सारे मी अनुभवतो आहे..तेच नोंदविले...ही तशी व्यक्तिशः नोंद आहे इतकेच...सगळेच यात सहमत रहातील असे नाही...)



सुभाष इनामदार, पुणे.

Monday, June 18, 2012

गेल्यानंतर सांगायला एक शब्द पुरेसा होतो...



जगायला आयुष्य अपुरे वाटते...
गेल्यानंतर सांगायला एक शब्द पुरेसा होतो...

हासत हासत आयुष्य घालविणारी..चेह-यावरचे हास्य न मावळणारी..माझ्यावर कौतुकाची थाप देऊन आशीर्वादाचे चार शब्द मनसोक्त देणारी माझी मामेबहिण अचानक गेली..कुणाला न कळवता.. न बोलता..कुणालाही न त्रास देता...आपले दुःख उराशी बाळगत तिने देह ठेवला..वयाची ८० वर्षे होतानाही ..पतीच्या निधनानंतरही घराला घरपण देणारी आणि जुने ते घर सांभाळणारी ही बहीण...आज तिच्या आठवणीने मन गलबलून गेले.

पुण्यात मी आलो..तिचा आधार होता..जोगेश्वरीजवळच्या देव वाड्यातले तिचे जुने वाड्यातले घर जपून ठेवले...ओल..खड्डे..अपुरा प्रकाशातही तिने गेली ६० वर्षें जागा जपली..

कित्येकांचा तो एक आसरा होता...पुण्यात आल्यानंतर तिच्या घराची ओढ प्रत्येकाला असायची...
जसे जमेल तसा पाहुणचार करुन शिष्टाचार सांभाळून तिने घर जपले..वाढविले..

तशी ती माझ्या आईवर माया करणारी..वडिलांनाही.आधार वाटणारी...पैशाची श्रीमंती नसली तरी मनाची बोलकी..चार सल्ले मनापासून देणारी ....

आज तिच्या दोन मुली तिचा वारसा सांभाळणार आहे...जावई,नातू आहेत. भाऊ बहिणी आहेत...पण तिचे जाणे चटका लावणारे...
तशी तिली गाण्याची आवड...डेक्कनवरच्या घाटेंच्या गायन क्लासचा वारसा होता तिच्याकडे...गाणे शिकायचे होते...पण ते राहिले...पण आवड जबरदस्त....

सासू, दिर,नणंद सा-यांची काळजी घेऊन...आपल्या पतीच्या आजारपणात जीवाचे रान करणारी ती बहिण आज न सांगता...काहीही न बोलता..अबोल झाली....हिच खंत आणि हिच श्रध्दांजली...


जाणारा मागे ठेऊन जातो आठवणींचा खजीना..
त्यावर तर जपत जातो आपला सारा जमाना..





सुभाष इनामदार, पुणे

Sunday, June 17, 2012

माझे वडील




हाफ खाकी पॅन्ट आणि वर पांढरा शर्ट अशा साध्या पोशाखात माझे वडील पिठाच्या गिरणीत जायचे. त्यांचा तो पोटापाण्याचा व्यवसाय होता. आपल्या मुलांना दोन वेळची भ्रांत पडू नयो म्हणून ते नियमाने सकाळी चार तास आणि दुपारी चाक तास गिरणी चालवायचे. मिळकत फार नव्हती..पण आलेल्या पैशातून घराची किरकोळ खर्चाची हातमिळवणी व्हायची...

पुढे पुढे..गिरणीतली कमाई कमी झाली..गिरणी विकून टाकली..वडील घरी सातरच्या भावे सुपारीवाल्यांच्या पुड्य़ा भरण्याचे काम करायचे...

वय वाढले तसे ते थकले...काम होईनासे झाले..पण कधीही चेह-यावरचा आनंदी भाव कमी झाला नाही...जे मिळेल ते आनंदाने ...समाधानाने झेलायचे...

पुढे त्यांच्या ओषधांचा खर्च अधिक व्हायला लागला.. आणि आपण तर काही मिळवित नाही याची खंत त्यांना सतत बोचायची... पण वडिलांच्या चेह-यावरचे समाधान विरघळले नाही...अखेर पर्यंत..


यातून एकच शिकलो..कामाला मागे हटायचे नाही..
आहे या परिस्थितीत समाधाननाने रहायचे....आज ते नाहीत...

पण तिच माझा पुंजी आहे....

ही एक ओळख करुन द्यायला आवडेल..
पण ते आता सारे कुठे लिहता येते...
जे मनात दाटते ते तिथेच गाठते...
मागे केवळ स्मृतीच..
त्याच त्या घेऊन..जीवनाची पुढील दिशा होत आहे.