Friday, May 16, 2025

रविंद्र संगीताचे आणि टागोर यांची प्रतिभा सांगणारा कार्यक्रम..!

 रविंद्र संगीत आणि टागोर..यांचे महत्व सांगणारा अद्भुत कार्यक्रम राधा मंगेशकर करतात..तो पुढेही होत रहावा..!



रविंद्रनाथ टागोरांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतनच्या विश्वभारती विद्यापीठाच्या नियमानुसार सादर करण्यात आलेल्या रवींद्र संगीताच्या लहरी आणि रविंद्र संगीत म्हणून सादर होणारी पारंपारिक गाण्यांची ओळख करून देणारा कार्यक्रम गुरुवारी पुण्यात या संगीताच्या अभ्यासक आणि गायिका राधा मंगेशकर यांनी करून उपस्थित रसिकांना टागोर यांच्या वरील त्यांच्या अभ्यासपूर्ण विवेचनातून मोहित करून सोडले.
रविंद्रनाथ टागोरांनी लिहिलेली..स्वरबद्ध.. संगीतबद्ध केलेली गाणी म्हणजे रविंद्र संगीत.. ती सुमारे दोन हजार गाणी आहेत.
माझे हे मन..माझे हे हृदय ..
कदाचित राहील किंवा नाही राहील..
मी स्वतः कदाचित तुझ्या लक्षातही राहणार नाही.
पण मी कुठलाही हेतू न बाळगता
कुठलीही अभिलाषा न ठेवता
मी रोज तुझ्या दारात येईन
आणि तुझ्यासाठी एक गाणे गाऊन जाईन..
अशी सुरवात करून
टागोर यांची गाणी गायला सुरुवात केली..
मोने रोबे की ना रोबे ..
राधा मंगेशकर..यांनी रविंद्र संगीत बरोबरच रविंद्रनाथ टागोरांच्या सर्व साहित्याचा अभ्यास करून त्यावर डॉक्टरेट प्राप्त केली आहे..त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाला महत्व प्राप्त होत असते..टागोर यांच्या कविता..कथा..गोष्टी..कादंबऱ्या.. चित्रकार..विचारवंत..





त्यांचे जीवन आणि त्यांनी लिहिलेली गीतांजली यांचे त्या अतिशय मार्मिकपणे त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे विवेचन करतात तेंव्हा ते नव्याने आपल्या पर्यंत पोहोचते..यातून टागोर यांची प्रतिभा..त्यांचे त्यामागचे विचार याचे दर्शन घडते..
रविंद्र संगीत आणि टागोर यांचे साहित्य दर्शन घडविणारा हा कार्यक्रम राधा मंगेशकर अतिशय गंभीरपणे आणि संगीतातील महत्व लक्षात घेऊन करतात.. यामुळे रविंद्र संगीत आणि टागोर यांचे साहित्यामुळे रसिकांच्या मनात कायम लक्षात राहते.. बंगाली भाषा अतिशय सोपी असून त्याची गोडी लागावी असेच त्यांचे विचार होते.
टागोर साहित्य अभ्यासण्याची ..त्याची खोली कळण्याची उर्मी वाढविणारा कार्यक्रम..!
असा कार्यक्रम फारसा लोकप्रिय होत नाही..त्याला रसिकांची उपस्थिती नसते..तरीही हा एक महत्वाचा सांस्कृतिक मूल्य जपणारा कार्यक्रम आहे.. तो राधा मंगेशकर यांनी यापुढेही केला पाहिजे..आणि मनोरंजनाचे संस्थापक नाना
रायरीकर यांच्या जन्म शताब्दी निमित्ताने शिरीष
रायरीकर यांनी खास आयोजित करून रवींद्र संगीत म्हणजे नेमके काय..कसे..याबद्दल उत्सुकता वाढविणारा सादर केला याबद्दल त्यांचेही आभार..




चारुलता.. सत्यजित रे..यांचा चित्रपट..
रविंद्रनाथ टागोर.. यांच्या कथेतील
माणूस..आणि त्याच्या मनातील भावना..यांचे दर्शन घडविणाऱ्या कथा.
संपूर्ण टागोर यांचे साहित्य..त्यातले सोपेपण..
काबुलीवाला..
सौंदर्य म्हणजेच ईश्वर.. महामाया
उपहार..पोस्टमास्टर.. चौकर भाले..
शिक्षा
.कथा....त्याचा सारांश..
राधा मंगेशकर.. यांचा कार्यक्रम रवींद्र संगीत..
विश्वशांती..निकेतन...यांनी रविंद्र संगीताचे नियम केले आहेत..तुम्ही त्या चाली बदलावायच्या नाहीत.. मूळ चाल तशीच रहायला हवी..त्यासाठी टागोर यांनी लिहलेले नोटेशन त्याच पद्धतीने गायचे..हे केलेले ते नियम सांगून आणि आपल्या सादरीकरणात पाळून राधा मंगेशकर यांनी ती गाणी गायली.
म्हणूनच हे रविंद्र संगीत आजही शंभर वर्षे त्याच स्वरसंस्कारात टिकून आहे.
शेई भालो आमारे न होय
तत्त्वज्ञान..टागोर यांचे विचारवंत म्हणून असलेले महत्व
..सौंदर्य प्रधान..निसर्ग..नियती..ईश्वर.. याबद्दल टागोर यांचे साहित्य
आणि कबीर यांच्या काव्याचे इंग्रजी मध्ये भाषांतर साँग्ज ऑफ कबीर..याबद्दल त्या सांगतात..
तोमार होलो सुरू, आमार होलो शारा





टागोर म्हणजे कवी..
गीतांजलीचे इंग्रजी भाषेत भाषांतर झाल्याने त्याचे महत्व सगळ्यांना कळाले..म्हणूनच ते टागोर यांचे विचारवंत म्हणून झाला महत्व कळले..त्याचे अनमोल महत्व राधा मंगेशकर अतिशय सुंदर शब्दात वर्णन करून सांगतात..
शोनार तोरी..कविता..





मध्यंतरानंतर..टागोर यांची नाटके
वाल्मिकी प्रतिभा
विसर्जन
डाकघर
रविंद्र नृत्य नाट्य.. त्यातले
चित्रांगदा
शामा
चांडालिका..याबद्दल त्या बोलतात
खनिकेर अतिथी म्हणजे क्षणिक अतिथी..
सुखे आमाय राखबे केनो ..
तुमि मोर पाओ ना पोरिचॉय
ऍकला चॅलो रे... या लोकप्रिय असलेल्या रविंद्र संगीतातील गाण्याने शेवट.. ह्यात बाऊल संगीत..वापरले आहे..हे आहे ईश्वर आराध्येचे गाणे..
आपल्या एकूणच सादरीकरणात ...
- मधु गंधे भरा...
- सोनार तरी
- तुमि रबे निरबे
- आय तोबे सहचरी
या रचनांची निवड केली होती..




कार्यक्रमाची सांगता "ऍकला चॅलो रे.." या अप्रतिम गीताने करून कार्यक्रम एका सुरेख उंचीवर नेला.
कार्यक्रमाची सांगता "ऍकला चॅलो रे.." या अप्रतिम गीताने करून कार्यक्रम एका सुरेख उंचीवर नेला. आयन गफूर यांच्या उत्तम ध्वनिव्यवस्थेने ही रंगत अधिक वाढली..
वाद्यांच्या साथीला डॉ. राजेंद्र दूरकर, विशाल Vishal Gandratwar आणि यश भंडारे यांनी ताल सुरांची बहारदार साथ संगत केल्याने.. प्रॉपर बंगाली संगीत ऐकण्याचा नाद मनात कायम लक्षात राहिला.


- Subhash Inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com

No comments: